AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक…झोप उडवणारी माहिती समोर!

इराण आणि इस्त्रायल युद्धात आणखी एक देश उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर भारताचे चांगलेच टेन्शन वाढणार आहे. तब्बल 42 लाख लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होणार आहे.

युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक...झोप उडवणारी माहिती समोर!
donald trump and mojtaba khameneiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 6:28 PM
Share

Iran Israel War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगात भीती निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच हे युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी इराणकडून आखाती देशांवर मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आखाती देशही इराणवर चांगलेच संतापलेले आहेत. त्यामुळेच आता या युद्धाची व्याप्ती वाढून आणखी एक देश या युद्धात उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता जर खरी ठरली तर मात्र भविष्यात मोठा नरसंहार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडतंय?

अमेरिका आणि इस्त्रायलचा प्रतिकार करताना इराण देश आखातातील संयुक्त अरब अमिरातीवर सातत्याने हल्ले करत आहे. या देशावर इराणने आतापर्यंत 2200 ड्रोन, क्षेपणास्त्र डागले आहेत. त्यामुळेच यूएई इराणवर प्रचंड रागावलेला आहे. इराणच्या या भूमिकेमुळे संयुक्त अरब अमिरातीने प्रत्युत्तर देणाचा आमचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे, असा इशारा अनेकदा दिलेला आहे. त्यामुळे यूएई हा देशदेखील भविष्यात युद्धात उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

42 लाख भारतीयांची सुरक्षा धोक्यात

वॉल स्ट्रिट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार यूएई हा देश सध्या वाट पाहतो आहे. हा देश लवकरच इराणविरोधात युद्धात उतरू शकतो. हा देश जर युद्धात उतरला तर त्याचा थेट फटका भारताला बसणार आहे. कारण यूएईमध्ये काम करण्यासाठी, नोकरीला गेलेल्या भारतीयांचे प्रमाण खूपच जास्त आहे. प्राथमिक अंदाजानुसार साधारण 42 लाख भारतीय लोक यूएईमध्ये राहतात. हे प्रमाण यूएईच्या एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के आहे. यूएई युद्धात उतरला तर या सर्व 42 लाख लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. भारताला या लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलावी लागू शकतात. त्यामुळेच अशा स्थितीत भारताचा चांगला कस लागू शकतो. दरम्यान, आता भविष्यात नेमकं काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!