AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक…झोप उडवणारी माहिती समोर!

इराण आणि इस्त्रायल युद्धात आणखी एक देश उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर भारताचे चांगलेच टेन्शन वाढणार आहे. तब्बल 42 लाख लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होणार आहे.

युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक...झोप उडवणारी माहिती समोर!
donald trump and mojtaba khameneiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 6:28 PM
Share

Iran Israel War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगात भीती निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच हे युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी इराणकडून आखाती देशांवर मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आखाती देशही इराणवर चांगलेच संतापलेले आहेत. त्यामुळेच आता या युद्धाची व्याप्ती वाढून आणखी एक देश या युद्धात उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता जर खरी ठरली तर मात्र भविष्यात मोठा नरसंहार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडतंय?

अमेरिका आणि इस्त्रायलचा प्रतिकार करताना इराण देश आखातातील संयुक्त अरब अमिरातीवर सातत्याने हल्ले करत आहे. या देशावर इराणने आतापर्यंत 2200 ड्रोन, क्षेपणास्त्र डागले आहेत. त्यामुळेच यूएई इराणवर प्रचंड रागावलेला आहे. इराणच्या या भूमिकेमुळे संयुक्त अरब अमिरातीने प्रत्युत्तर देणाचा आमचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे, असा इशारा अनेकदा दिलेला आहे. त्यामुळे यूएई हा देशदेखील भविष्यात युद्धात उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

42 लाख भारतीयांची सुरक्षा धोक्यात

वॉल स्ट्रिट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार यूएई हा देश सध्या वाट पाहतो आहे. हा देश लवकरच इराणविरोधात युद्धात उतरू शकतो. हा देश जर युद्धात उतरला तर त्याचा थेट फटका भारताला बसणार आहे. कारण यूएईमध्ये काम करण्यासाठी, नोकरीला गेलेल्या भारतीयांचे प्रमाण खूपच जास्त आहे. प्राथमिक अंदाजानुसार साधारण 42 लाख भारतीय लोक यूएईमध्ये राहतात. हे प्रमाण यूएईच्या एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के आहे. यूएई युद्धात उतरला तर या सर्व 42 लाख लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. भारताला या लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलावी लागू शकतात. त्यामुळेच अशा स्थितीत भारताचा चांगला कस लागू शकतो. दरम्यान, आता भविष्यात नेमकं काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.