AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक…झोप उडवणारी माहिती समोर!

इराण आणि इस्त्रायल युद्धात आणखी एक देश उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर भारताचे चांगलेच टेन्शन वाढणार आहे. तब्बल 42 लाख लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होणार आहे.

युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक...झोप उडवणारी माहिती समोर!
donald trump and mojtaba khameneiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 6:28 PM
Share

Iran Israel War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगात भीती निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच हे युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी इराणकडून आखाती देशांवर मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आखाती देशही इराणवर चांगलेच संतापलेले आहेत. त्यामुळेच आता या युद्धाची व्याप्ती वाढून आणखी एक देश या युद्धात उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता जर खरी ठरली तर मात्र भविष्यात मोठा नरसंहार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडतंय?

अमेरिका आणि इस्त्रायलचा प्रतिकार करताना इराण देश आखातातील संयुक्त अरब अमिरातीवर सातत्याने हल्ले करत आहे. या देशावर इराणने आतापर्यंत 2200 ड्रोन, क्षेपणास्त्र डागले आहेत. त्यामुळेच यूएई इराणवर प्रचंड रागावलेला आहे. इराणच्या या भूमिकेमुळे संयुक्त अरब अमिरातीने प्रत्युत्तर देणाचा आमचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे, असा इशारा अनेकदा दिलेला आहे. त्यामुळे यूएई हा देशदेखील भविष्यात युद्धात उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

42 लाख भारतीयांची सुरक्षा धोक्यात

वॉल स्ट्रिट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार यूएई हा देश सध्या वाट पाहतो आहे. हा देश लवकरच इराणविरोधात युद्धात उतरू शकतो. हा देश जर युद्धात उतरला तर त्याचा थेट फटका भारताला बसणार आहे. कारण यूएईमध्ये काम करण्यासाठी, नोकरीला गेलेल्या भारतीयांचे प्रमाण खूपच जास्त आहे. प्राथमिक अंदाजानुसार साधारण 42 लाख भारतीय लोक यूएईमध्ये राहतात. हे प्रमाण यूएईच्या एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के आहे. यूएई युद्धात उतरला तर या सर्व 42 लाख लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. भारताला या लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलावी लागू शकतात. त्यामुळेच अशा स्थितीत भारताचा चांगला कस लागू शकतो. दरम्यान, आता भविष्यात नेमकं काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....