AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील अनोखं गाव! प्रत्येकजण आहे ज्योतिषी, क्षणात सांगू शकतात तुमचं भविष्य

Unique Village: इंडोनेशियातील जावा बेटावर बादुई जमातीचे एक अनोखे गाव आहे. हे गाव नकाशावर दिसते, मात्र ते बाहेरील जगापासून खूप दूर आहे. या गावात मोबाईल फोन, रेडिओ किंवा वीज यासारख्या गोष्टी नाहीत. पण या जमातीच्या लोकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या धार्मिक नेत्यांकडे अलौकिक शक्ती आहेत.

जगातील अनोखं गाव! प्रत्येकजण आहे ज्योतिषी, क्षणात सांगू शकतात तुमचं भविष्य
Baduy Village
| Updated on: Oct 12, 2025 | 11:04 PM
Share

जगात अशी अनेक ठिकाणे आहे जी आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. इंडोनेशियातील जावा बेटावर बादुई जमातीचे एक अनोखे गाव आहे. हे गाव नकाशावर दिसते, मात्र ते बाहेरील जगापासून खूप दूर आहे. या गावात मोबाईल फोन, रेडिओ किंवा वीज यासारख्या गोष्टी नाहीत. या ठिकाणी राहणाऱ्या बादुई लोकांना पृथ्वीवरील पहिले मानव म्हटले जाते. हे लोक संकट टाळण्यासाठी कठोर नियमांचे पालन करतात. पण या जमातीच्या लोकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या धार्मिक नेत्यांकडे अलौकिक शक्ती आहेत. ते एखाद्याच्या मनात काय सुरु आहे हे वाचू शकतात, तसेच एखाद्याचे भविष्य सांगू शकतात.

ट्रॅव्हल व्लॉगर इसा खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बादुई लोकांच्या जीवनाचा आणि या शक्तींचा इतिहास सांगतो. यातील माहिती पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे लोक देवाशी थेट संवाद साधू शकतात असंही मानलं जातं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बाहेरील लोकांना प्रवेश नाही

बादुई ही जमात बांटेन प्रांतातील कंधारसी गावाजवळ राहते. हा एक 12 हजार लोकांचा समूह आहे, जो सुंदा भाषा बोलतो. हे लोक स्वतःला जगातील पहिले लोक मानतात, त्यामुळे ते निसर्गाशी सुसंगत राहणे पसंत करतात. या व्हिडिओमध्ये ईसा खान यांनी सांगितले की, बादुई लोक मातीची धूप रोखण्यासाठी धातूच्या नांगरांचा वापर टाळतात. येथे शिक्षण, काच, दारू, चप्पल, पाण्याचा प्रवाह बदलणे आणि चार पायांचे प्राणी पाळणे या गोष्टींना मनाई आहे. तसेच खून, चोरी, खोटे बोलणे, नशा करणे, रात्री जेवण करणे, गाडी चालवणे, फुले किंवा अत्तर लावने घालणे, सोने किंवा चांदी स्वीकारणे, पैशांना हात लावणे किंवा केस कापणे यावर मनाई आहे. जे लोक हे नियम पाळत नाहीत ते मुख्य गावाबाहेर राहतात कारण त्यांना गावातून बाहेर हाकलून दिलेले असते.

बदल होण्यास सुरुवात

बादुई समुदाय दोन भागात विभागलेला आहे. एक बाह्य बदुई जिथे आधुनिकीकरणाचा शिरकाव झालेला आहे आणि दुसरे म्हणजे अंतर्गत बादुई जिथे परंपरा पाळल्या जातात. बाहेरील लोकांना अंतर्गत बादुईमध्ये प्रवेश करता येत नाही. आतमधील गावात जवळपास प्रत्येकाकडे मन वाचण्याची आणि भविष्य पाहण्याची कला आहे असं मानलं जातं. “पु’उन” नावाच्या धार्मिक नेत्यांकडे अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते. ते मन वाचू शकतात, भविष्यही सांगू शकतात, तसेच एखाद्याचे नशीब बदलू शकतात. बाहेरील लोकांना ते करत असलेले विधी पाहण्याची परवानगी नाही.

या विधींद्वारे ते निसर्गाची पूजा करतात आणि त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. बादुई लोकांच्या श्रद्धा सांगा सारी (सुंडा हिंदू) परंपरेतून निर्माण झाल्या आहेत, जिथे निसर्गाला देवत्व दिले जाते. हे लोक पांढरे कपडे घालतात, लांब केस ठेवतात. हे लोक लाकडी अवजारांनी शेती करतात. शेतीतून ते तांदूळ आणि मका ही पिके घेतात. त्यासोबतच जंगलातून फळे आणि भाज्या गोळा करणे हे त्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?