AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील अनोखं गाव! प्रत्येकजण आहे ज्योतिषी, क्षणात सांगू शकतात तुमचं भविष्य

Unique Village: इंडोनेशियातील जावा बेटावर बादुई जमातीचे एक अनोखे गाव आहे. हे गाव नकाशावर दिसते, मात्र ते बाहेरील जगापासून खूप दूर आहे. या गावात मोबाईल फोन, रेडिओ किंवा वीज यासारख्या गोष्टी नाहीत. पण या जमातीच्या लोकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या धार्मिक नेत्यांकडे अलौकिक शक्ती आहेत.

जगातील अनोखं गाव! प्रत्येकजण आहे ज्योतिषी, क्षणात सांगू शकतात तुमचं भविष्य
Baduy Village
| Updated on: Oct 12, 2025 | 11:04 PM
Share

जगात अशी अनेक ठिकाणे आहे जी आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. इंडोनेशियातील जावा बेटावर बादुई जमातीचे एक अनोखे गाव आहे. हे गाव नकाशावर दिसते, मात्र ते बाहेरील जगापासून खूप दूर आहे. या गावात मोबाईल फोन, रेडिओ किंवा वीज यासारख्या गोष्टी नाहीत. या ठिकाणी राहणाऱ्या बादुई लोकांना पृथ्वीवरील पहिले मानव म्हटले जाते. हे लोक संकट टाळण्यासाठी कठोर नियमांचे पालन करतात. पण या जमातीच्या लोकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या धार्मिक नेत्यांकडे अलौकिक शक्ती आहेत. ते एखाद्याच्या मनात काय सुरु आहे हे वाचू शकतात, तसेच एखाद्याचे भविष्य सांगू शकतात.

ट्रॅव्हल व्लॉगर इसा खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बादुई लोकांच्या जीवनाचा आणि या शक्तींचा इतिहास सांगतो. यातील माहिती पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे लोक देवाशी थेट संवाद साधू शकतात असंही मानलं जातं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बाहेरील लोकांना प्रवेश नाही

बादुई ही जमात बांटेन प्रांतातील कंधारसी गावाजवळ राहते. हा एक 12 हजार लोकांचा समूह आहे, जो सुंदा भाषा बोलतो. हे लोक स्वतःला जगातील पहिले लोक मानतात, त्यामुळे ते निसर्गाशी सुसंगत राहणे पसंत करतात. या व्हिडिओमध्ये ईसा खान यांनी सांगितले की, बादुई लोक मातीची धूप रोखण्यासाठी धातूच्या नांगरांचा वापर टाळतात. येथे शिक्षण, काच, दारू, चप्पल, पाण्याचा प्रवाह बदलणे आणि चार पायांचे प्राणी पाळणे या गोष्टींना मनाई आहे. तसेच खून, चोरी, खोटे बोलणे, नशा करणे, रात्री जेवण करणे, गाडी चालवणे, फुले किंवा अत्तर लावने घालणे, सोने किंवा चांदी स्वीकारणे, पैशांना हात लावणे किंवा केस कापणे यावर मनाई आहे. जे लोक हे नियम पाळत नाहीत ते मुख्य गावाबाहेर राहतात कारण त्यांना गावातून बाहेर हाकलून दिलेले असते.

बदल होण्यास सुरुवात

बादुई समुदाय दोन भागात विभागलेला आहे. एक बाह्य बदुई जिथे आधुनिकीकरणाचा शिरकाव झालेला आहे आणि दुसरे म्हणजे अंतर्गत बादुई जिथे परंपरा पाळल्या जातात. बाहेरील लोकांना अंतर्गत बादुईमध्ये प्रवेश करता येत नाही. आतमधील गावात जवळपास प्रत्येकाकडे मन वाचण्याची आणि भविष्य पाहण्याची कला आहे असं मानलं जातं. “पु’उन” नावाच्या धार्मिक नेत्यांकडे अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते. ते मन वाचू शकतात, भविष्यही सांगू शकतात, तसेच एखाद्याचे नशीब बदलू शकतात. बाहेरील लोकांना ते करत असलेले विधी पाहण्याची परवानगी नाही.

या विधींद्वारे ते निसर्गाची पूजा करतात आणि त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. बादुई लोकांच्या श्रद्धा सांगा सारी (सुंडा हिंदू) परंपरेतून निर्माण झाल्या आहेत, जिथे निसर्गाला देवत्व दिले जाते. हे लोक पांढरे कपडे घालतात, लांब केस ठेवतात. हे लोक लाकडी अवजारांनी शेती करतात. शेतीतून ते तांदूळ आणि मका ही पिके घेतात. त्यासोबतच जंगलातून फळे आणि भाज्या गोळा करणे हे त्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन आहे.

Follow Us
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा.
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत...
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत....
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....