AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wagah-Attari border : ‘माझ्या बहिणीच पाकिस्तानात जाणं गरजेच, पण…’

Wagah-Attari border : भारतीय नागरिक जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात, त्यांना अद्यापही प्रवेश बंदी आहे. पाकिस्तानी नागरिकांना अटारी बॉर्डरवरून जाण्यास परवानगी आहे. मात्र भारतीय नागरिक जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात त्यांना प्रवेशबंदी कायम आहे.

Wagah-Attari border : 'माझ्या बहिणीच पाकिस्तानात जाणं गरजेच, पण...'
Attari Wagah BorderImage Credit source: File photo
| Updated on: May 02, 2025 | 11:53 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सर्वप्रथम भारताने डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला. त्या अंतर्गत पाकिस्तान सोबत राजनैतिक संबंध कमी केले. सिंधू जल कराराला स्थगिती दिली आणि भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. त्यामुळे 24 एप्रिलपासून वाघा-अटारी सीमेवर भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून-भारतात येणाऱ्या नागरिकांची रांग लागली होती. भारतीय नागरिक जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात, त्यांना अद्यापही प्रवेश बंदी आहे. पाकिस्तानी नागरिकांना अटारी बॉर्डरवरून जाण्यास परवानगी आहे. मात्र भारतीय नागरिक जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात त्यांना प्रवेशबंदी कायम आहे.

“माझ्या बहिणीच पाकिस्तानी नागरिकाशी लग्न झालेलं आहे. ती लाहोरमध्ये वास्तव्यास असते. मात्र तिचं नागरिकत्व भारतीय आहे. सध्या पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश दिला जातोय. मात्र भारतीय नागरिकांना सोडले जात नाहीये. माझ्या बहिणीची लहान मुलगी आहे. तिचा सांभाळ करण्यासाठी बहिणीच पाकिस्तानात जाणं गरजेचं आहे. बीएसएफकडून असे सांगण्यात येत आहे की सध्या फक्त पाकिस्तानी नागरिकांना सोडले जाईल. तुम्ही वाट पहा. महिन्याभरापूर्वी माझी बहीण वडिलांना भेटण्यासाठी भारतात आलेली होती. आता तिला पुन्हा पाकिस्तानात जायचे आहे” असं रईस शेख यांनी सांगितलं.

‘माझ्या वडिलांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं’

“माझं 12 वर्षापूर्वी पाकिस्तानात लग्न झालं. तेंव्हापासून मी तिथे वास्तव्यास आहे. महिन्याभरपूर्वी माझ्या आईला भेटण्यासाठी म्हणून मी दिल्लीला आले होते. माझ्या वडिलांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं. तेंव्हा मी येऊ शकले नाही म्हणून आता महिन्याभरासाठी आले होते. अटारी बॉर्डरचे दरवाजे सध्या उघडले आहेत. मात्र फक्त पाकिस्तानी नागरिकांनाच पाकिस्तानात जाऊ दिले जात आहे. आम्ही दोन दिवसापासून या बॉर्डरवर वाट पाहतोय की आम्हलाही जाऊ दिलं जाईल. मात्र प्रवेश नाकारला जातोय. आमची मागणी आहे की आमच्या कुटुंबियांचा विचार करून आम्हाला जाऊ दिले जावे” असं शर्मिन इरफान यांनी सांगितलं.

‘आम्हाला आज तरी सोडा’

“माझे 18 वर्षापूर्वी कराचीत लग्न झालं, तेंव्हापासून मी तिथे माझ्या कुटुंबियांसहित राहते. माझे पती आणि परालाईज झालेला मुलगा माझी वाट पाहतोय. आम्हाला कालपासून पाकिस्तानात प्रवेश दिला जात नाहीये. पाकिस्तानने आम्हाला आतमध्ये येण्यास परवानगी दिलीय. मात्र भारत सरकारकडून आम्हाला न सोडण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे. आम्ही कालपासून इथे आहोत. आम्हाला आज तरी सोडण्यात यावं” असं नबीला इम्रान म्हणाली.

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...