AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण, भावूक होत म्हणाल्या की…दादांचे स्वप्न पूर्ण..

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती.त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात विलीनीकरणावरुन दावे-प्रतिदावे केले जात असतानाच सुनेत्रा पवार यांनी आपले पहिले भाषण केले आहे.

सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण, भावूक होत म्हणाल्या की...दादांचे स्वप्न पूर्ण..
sunetra pawar first speech
| Updated on: Feb 15, 2026 | 10:57 PM
Share

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर स्वत:ला सावरले आणि पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनास सुरुवात केली आहे. त्यांनी आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषण देखील केले आहे. अजितदादा यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर १३ दिवसांनी त्यांनी प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री पदाचा प्रत्यक्षात चार्ज घेतला… आज त्यांनी आपले पहिले भाषण केले असून ते व्हायरल झाले आहे.

२८ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पाच जणांचा मुंबईहून बारामतीला येताना विमान कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये विलीनीकरणावरुन कलगीतुरा सुरु झाला आहे. शरद पवार यांनी अजितदादांनी विलीनीकरणासंदर्भात बैठका घेतल्याचे सांगितले. तसेच १२ तारखेला अजितदादांशी आमची बैठक झाली होती. दादांनी एकत्र यायचे असे ठरवले होते. परंतू मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर झाल्या, त्यामुळे अंतिम बोलणी पुढे ढकलली गेल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. आता राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षाचे नेते विलीनीकरण हे निवडणूकांपुरते होते असा दावा करत आहेत. जर विलीनीकरणाची एवढी घाई कशाला केली जात आहे असा सवाल करत आहेत.

दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो

या सर्व पाश्र्वभूमीवर अजितदादांच्या याच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली आणि आता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. सुनेत्रा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना प्रोत्साहन आणि नवीन ऊर्जा देण्यासाठी भाषण करताना त्या भावूक झाल्या. दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. तुम्ही दादांचे स्वप्न तुम्ही पूर्ण कराल याची खात्री आहे असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या शेजारी कृषी मंत्री दत्ता भरणे देखील बसलेले दिसत आहेत.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा