AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून पाकिस्तानची ‘आयएमएफ’मध्ये पोलखोल, भारताने बेल आउट पॅकेजवर का केले नाही मतदान?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत आली आहे. पाकिस्तान पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीवर अवलंबून आहे. भारताने या मतदानावर बहिष्कार टाकत महत्वाचा संदेशही दिला आहे. त्यात आयएमएफसारख्या संस्थांनी दिलेल्या या मदतीमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण होतो.

भारताकडून पाकिस्तानची 'आयएमएफ'मध्ये पोलखोल, भारताने बेल आउट पॅकेजवर का केले नाही मतदान?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज मंजूर केले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 10, 2025 | 8:44 AM
Share

भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 1 बिलियन डॉलरचे कर्ज दिले. परंतु यासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत भारत मतदान करु शकला नाही. मात्र, भारताने आयएमएफसमोर पाकिस्तानची पोलखोल केली आहे. यापूर्वी पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा उपयोग पाकिस्ताने योग्य पद्धतीने केला नाही. हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा आरोप भारताने केला. भारताच्या तीव्र विरोधानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज मंजूर केले.

9 मे रोजी वॉशिंग्टनमध्ये आयएमएफ बोर्डाची बैठक झाली. त्या बैठकीत पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी पूर्ण केल्या गेल्या नसल्याचे भारताने सांगितले. त्यासाठी भारताने आयएमएफचा रिपोर्टचा आधार घेतला. वारंवार बेलआउट पॅकेज घेतल्यानंतर पाकिस्तानवर कर्जाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यानंतरही आयएमएफ पाकिस्तानला कर्ज देत आहे. आयएमएफकडून मिळालेल्या या कर्जाचा वापर पाकिस्तानकडून योग्य पद्धतीने केला गेला नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांसाठी त्या कर्जाचा वापर केला गेला आहे. आयएमएफकडून मिळालेल्या या मदतीमुळे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांना पाठिंबा मिळत आहे.

आयएमएफमध्ये निर्णय सहसा एकमताने घेतले जातात. परंतु जेव्हा मतदान होते, तेव्हा नाही म्हणून मतदान करण्याचा पर्याय नसतो. सदस्य देश फक्त समर्थनार्थ मतदान करू शकतात किंवा मतदानापासून दूर राहू शकतात. भारताने बेलआउट पॅकेजला उघडपणे विरोध केला. परंतु होकार नसल्याने नियमांनुसार भारत मतदानापासून दूर राहिला. भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील आपले कार्यकारी संचालक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांना नियोजित कालावधीच्या सहा महिने आधी परत बोलावले होते. यामुळे भारत सध्या आयएमएफमध्ये मतदान करण्याच्या स्थितीत नव्हता.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत आली आहे. पाकिस्तान पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीवर अवलंबून आहे. भारताने या मतदानावर बहिष्कार टाकत महत्वाचा संदेशही दिला आहे. त्यात आयएमएफसारख्या संस्थांनी दिलेल्या या मदतीमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण होतो. मतदान न करता भारताने जगाला आपला संदेश दिला आहे.

हे ही वाचा…

कंगाल पाकिस्तानला दिलासा, भारताच्या विरोधानंतरही ‘आयएमएफ’कडून एक अब्ज डॉलरचे कर्ज

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.