AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून पाकिस्तानची ‘आयएमएफ’मध्ये पोलखोल, भारताने बेल आउट पॅकेजवर का केले नाही मतदान?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत आली आहे. पाकिस्तान पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीवर अवलंबून आहे. भारताने या मतदानावर बहिष्कार टाकत महत्वाचा संदेशही दिला आहे. त्यात आयएमएफसारख्या संस्थांनी दिलेल्या या मदतीमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण होतो.

भारताकडून पाकिस्तानची 'आयएमएफ'मध्ये पोलखोल, भारताने बेल आउट पॅकेजवर का केले नाही मतदान?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज मंजूर केले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 10, 2025 | 8:44 AM
Share

भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 1 बिलियन डॉलरचे कर्ज दिले. परंतु यासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत भारत मतदान करु शकला नाही. मात्र, भारताने आयएमएफसमोर पाकिस्तानची पोलखोल केली आहे. यापूर्वी पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा उपयोग पाकिस्ताने योग्य पद्धतीने केला नाही. हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा आरोप भारताने केला. भारताच्या तीव्र विरोधानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज मंजूर केले.

9 मे रोजी वॉशिंग्टनमध्ये आयएमएफ बोर्डाची बैठक झाली. त्या बैठकीत पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी पूर्ण केल्या गेल्या नसल्याचे भारताने सांगितले. त्यासाठी भारताने आयएमएफचा रिपोर्टचा आधार घेतला. वारंवार बेलआउट पॅकेज घेतल्यानंतर पाकिस्तानवर कर्जाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यानंतरही आयएमएफ पाकिस्तानला कर्ज देत आहे. आयएमएफकडून मिळालेल्या या कर्जाचा वापर पाकिस्तानकडून योग्य पद्धतीने केला गेला नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांसाठी त्या कर्जाचा वापर केला गेला आहे. आयएमएफकडून मिळालेल्या या मदतीमुळे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांना पाठिंबा मिळत आहे.

आयएमएफमध्ये निर्णय सहसा एकमताने घेतले जातात. परंतु जेव्हा मतदान होते, तेव्हा नाही म्हणून मतदान करण्याचा पर्याय नसतो. सदस्य देश फक्त समर्थनार्थ मतदान करू शकतात किंवा मतदानापासून दूर राहू शकतात. भारताने बेलआउट पॅकेजला उघडपणे विरोध केला. परंतु होकार नसल्याने नियमांनुसार भारत मतदानापासून दूर राहिला. भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील आपले कार्यकारी संचालक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांना नियोजित कालावधीच्या सहा महिने आधी परत बोलावले होते. यामुळे भारत सध्या आयएमएफमध्ये मतदान करण्याच्या स्थितीत नव्हता.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत आली आहे. पाकिस्तान पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीवर अवलंबून आहे. भारताने या मतदानावर बहिष्कार टाकत महत्वाचा संदेशही दिला आहे. त्यात आयएमएफसारख्या संस्थांनी दिलेल्या या मदतीमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण होतो. मतदान न करता भारताने जगाला आपला संदेश दिला आहे.

हे ही वाचा…

कंगाल पाकिस्तानला दिलासा, भारताच्या विरोधानंतरही ‘आयएमएफ’कडून एक अब्ज डॉलरचे कर्ज

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?