AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात कशी आली चटणीची परंपरा? यामागे आहे एक शाही हकीम आणि औषधी सूत्र

history of chutney : भारतीय थाळीत आज जिथे चटणीचा खास मान आहे, तिथे तुम्ही कधी विचार केलाय का की ही चविष्ट चटणी खरंतर कुठून आली? तर चला आज जाणून घेऊया यामागची एतीहासीक कहाणी

भारतात कशी आली चटणीची परंपरा? यामागे आहे एक शाही हकीम आणि औषधी सूत्र
ChutneyImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 6:30 PM
Share

आपल्या ताटात रोज दिसणारी, डोसा, समोसा, ढोकळा किंवा पराठ्यासोबत दिली जाणारी चविष्ट ‘चटणी’ केवळ मिरच्यांचा किंवा मसाल्यांचा गोळा नाही, तर तिच्यामागे लपलेली आहे एक रंजक आणि शाही गोष्ट. होय, हीच चटणी केवळ आपली चव वाढवत नाही, तर तिचा उगम थेट मुगल दरबाराशी, विशेषतः बादशाह शाहजहांशी जोडलेला आहे!

चटणीची सुरुवात कशी झाली?

इतिहास सांगतो की, एकदा मुगल बादशाह शाहजहां गंभीर आजारी पडले होते. त्यांना तीव्र पोटदुखी होत होती आणि शाही स्वयंपाकातील कोणताही पदार्थ त्यांना आराम देत नव्हता. वैद्य आणि हकीमांनी अनेक प्रयत्न करून पाहिले, पण काही उपयोग झाला नाही. अशा वेळी दरबारातील एका हुशार हकीमाने एक वेगळा उपाय सुचवला.

त्या हकीमाने सांगितले की, शाहजहां यांना असा काही पदार्थ खायला द्यावा, जो हलका, पचायला सोपा आणि औषधी गुणांनी भरलेला असावा. त्यासाठी त्याने काही ताज्या भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती जसे की पुदीना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि काही खास मसाले एकत्र करून एक पेस्ट तयार केली.

ही पेस्ट शाहजहां यांना खायला देण्यात आली. ती खाताच त्यांना थोडेसे हलके वाटू लागले आणि पोटदुखीही कमी झाली. त्याच वेळी तयार केलेल्या या खास पेस्टला पुढे जाऊन ‘चटणी’ हे नाव मिळाले.

सम्राटाच्या ताटातील ‘चटणी’ जनतेपर्यंत कशी पोहोचली?

जे सम्राटाच्या ताटात होते, ते जनतेपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. ही चविष्ट आणि आरोग्यदायी चटणी हळूहळू शाही रसोईतून सामान्य माणसाच्या घरात पोहोचली. काळानुसार आणि प्रदेशानुसार तिच्या चवीत व प्रकारात अनेक बदल होत गेले. कुठे टमाटर घालून, कुठे चिंच वापरून, तर कुठे नारळ घालून चटणी बनवली जाऊ लागली. प्रत्येक प्रदेशाने चटणीला आपला खास स्थानिक स्पर्श दिला आणि आज ती आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग बनली आहे.

चवीनं भरलेली चटणीची थाळी

आज भारतात शेकडो प्रकारच्या चटन्या उपलब्ध आहेत. गुजरातमध्ये ढोकळ्यासोबत हिरवी चटणी, उत्तर भारतात समोस्यासोबत लाल चिंच चटणी, तर दक्षिण भारतात डोश्यासोबत नारळाची चटणी – प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे. काही चटण्या गोडसर असतात, काही आंबटसर तर काही झणझणीत असतात. चव आणि आरोग्य यांचा हा उत्तम संगम आजही आपल्या थाळीत आवर्जून असतो.

समोसा, पकोडे आणि डोश्यासोबत चटणी का दिली जाते?

समोसा, पकोडे किंवा डोसा यांसारख्या पदार्थांमध्ये स्वतःची चव असली तरी त्यांची चव अधिक खुलवण्यासाठी त्यासोबत चटणी दिली जाते. चटणी हे केवळ पूरक नव्हे, तर त्या पदार्थाचा स्वाद दुप्पट करणारा घटक असतो. गोड, आंबट किंवा तिखट चटणीची चव पदार्थाशी जुळून येते आणि संपूर्ण खाण्याचा अनुभव अधिक स्वादिष्ट बनवते.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.