AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात कशी आली चटणीची परंपरा? यामागे आहे एक शाही हकीम आणि औषधी सूत्र

history of chutney : भारतीय थाळीत आज जिथे चटणीचा खास मान आहे, तिथे तुम्ही कधी विचार केलाय का की ही चविष्ट चटणी खरंतर कुठून आली? तर चला आज जाणून घेऊया यामागची एतीहासीक कहाणी

भारतात कशी आली चटणीची परंपरा? यामागे आहे एक शाही हकीम आणि औषधी सूत्र
ChutneyImage Credit source: Tv9 Network
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 6:30 PM
Share

आपल्या ताटात रोज दिसणारी, डोसा, समोसा, ढोकळा किंवा पराठ्यासोबत दिली जाणारी चविष्ट ‘चटणी’ केवळ मिरच्यांचा किंवा मसाल्यांचा गोळा नाही, तर तिच्यामागे लपलेली आहे एक रंजक आणि शाही गोष्ट. होय, हीच चटणी केवळ आपली चव वाढवत नाही, तर तिचा उगम थेट मुगल दरबाराशी, विशेषतः बादशाह शाहजहांशी जोडलेला आहे!

चटणीची सुरुवात कशी झाली?

इतिहास सांगतो की, एकदा मुगल बादशाह शाहजहां गंभीर आजारी पडले होते. त्यांना तीव्र पोटदुखी होत होती आणि शाही स्वयंपाकातील कोणताही पदार्थ त्यांना आराम देत नव्हता. वैद्य आणि हकीमांनी अनेक प्रयत्न करून पाहिले, पण काही उपयोग झाला नाही. अशा वेळी दरबारातील एका हुशार हकीमाने एक वेगळा उपाय सुचवला.

त्या हकीमाने सांगितले की, शाहजहां यांना असा काही पदार्थ खायला द्यावा, जो हलका, पचायला सोपा आणि औषधी गुणांनी भरलेला असावा. त्यासाठी त्याने काही ताज्या भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती जसे की पुदीना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि काही खास मसाले एकत्र करून एक पेस्ट तयार केली.

ही पेस्ट शाहजहां यांना खायला देण्यात आली. ती खाताच त्यांना थोडेसे हलके वाटू लागले आणि पोटदुखीही कमी झाली. त्याच वेळी तयार केलेल्या या खास पेस्टला पुढे जाऊन ‘चटणी’ हे नाव मिळाले.

सम्राटाच्या ताटातील ‘चटणी’ जनतेपर्यंत कशी पोहोचली?

जे सम्राटाच्या ताटात होते, ते जनतेपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. ही चविष्ट आणि आरोग्यदायी चटणी हळूहळू शाही रसोईतून सामान्य माणसाच्या घरात पोहोचली. काळानुसार आणि प्रदेशानुसार तिच्या चवीत व प्रकारात अनेक बदल होत गेले. कुठे टमाटर घालून, कुठे चिंच वापरून, तर कुठे नारळ घालून चटणी बनवली जाऊ लागली. प्रत्येक प्रदेशाने चटणीला आपला खास स्थानिक स्पर्श दिला आणि आज ती आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग बनली आहे.

चवीनं भरलेली चटणीची थाळी

आज भारतात शेकडो प्रकारच्या चटन्या उपलब्ध आहेत. गुजरातमध्ये ढोकळ्यासोबत हिरवी चटणी, उत्तर भारतात समोस्यासोबत लाल चिंच चटणी, तर दक्षिण भारतात डोश्यासोबत नारळाची चटणी – प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे. काही चटण्या गोडसर असतात, काही आंबटसर तर काही झणझणीत असतात. चव आणि आरोग्य यांचा हा उत्तम संगम आजही आपल्या थाळीत आवर्जून असतो.

समोसा, पकोडे आणि डोश्यासोबत चटणी का दिली जाते?

समोसा, पकोडे किंवा डोसा यांसारख्या पदार्थांमध्ये स्वतःची चव असली तरी त्यांची चव अधिक खुलवण्यासाठी त्यासोबत चटणी दिली जाते. चटणी हे केवळ पूरक नव्हे, तर त्या पदार्थाचा स्वाद दुप्पट करणारा घटक असतो. गोड, आंबट किंवा तिखट चटणीची चव पदार्थाशी जुळून येते आणि संपूर्ण खाण्याचा अनुभव अधिक स्वादिष्ट बनवते.

Follow Us
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...