AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दारू घेऊन जायचे असेल, तर हे नियम माहिती असायलाच हवे!

Liquor Rules in India: भारतात लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अगदी सहज प्रवास करतात परंतु तुम्हाला माहिती आहे का,तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दारू सोबत घेऊन प्रवास देखील करू शकता.

जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दारू घेऊन जायचे असेल, तर हे नियम माहिती असायलाच हवे!
दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये मृत्यूचा शिमगा, 25 जणांचा मृत्यूImage Credit source: twitter
| Updated on: Mar 04, 2022 | 4:48 PM
Share

भारतामध्ये दारू ( Liquor)संदर्भात प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नियम आपल्याला पाहायला मिळतात. अनेक राज्यांमध्ये दारू पूर्णपणे सेवनास व विक्री करण्यास देखील बंदी आहे, अशावेळी तुमच्याकडे दारू सापडली तर तुमच्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाते. जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जरी प्रवास करत असाल तर या राज्यांमध्ये जे नियम असतात, ते नियम आपल्याला पाळणे गरजेचे आहे. प्रवास करताना जर आपण या नियमांची अंमलबजावणी केली नाही तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे देखील जावे लागू शकते. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की, अनेक राज्यांमध्ये दारू विकणे किंवा दारू सेवन करणे यावर पूर्णतः बंदी ( Liquors ban)करण्यात आलेली आहे. परंतु तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर दारू सोबत घेऊन जायची असेल तर अशा वेळी नेमके नियम नेमके काय असतात याबद्दलची तुम्हाला माहिती आहे का? आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारू घेऊन जाणे, दुसऱ्या राज्यांमध्ये दारू सेवन करण्याबाबतचे कोणकोणते नियम असतात याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया दारू प्रवासामध्ये ( Liqiours carrying while travel) घेऊन जाण्याबाबतचे कोणकोणते नियम आहेत त्याबद्दल…

तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मध्ये दारू घेऊन जाऊ शकता ?

नियमानुसार तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारूची बॉटल घेऊन जाऊ शकता परंतु तुम्ही ज्या राज्यांमध्ये जाणार आहात तेथील काही नियमांचे पालन तुम्हाला करणे अनिवार्य आहे.जसे की तुम्ही एखाद्या राज्यांमध्ये आहात आणि त्या राज्यांमध्ये फक्त तुम्हाला दारूच्या 4 बॉटल सोबत नेण्याची परवानगी असेल आणि अशावेळी तुम्ही त्या राज्यांमध्ये जात आहात. या राज्यांमध्ये 2 बॉटल परवानगी असेल तर अशा वेळी प्रत्येक राज्याच्या नियमानुसार तेथील नियमावली तुम्हाला फॉलो करणे गरजेचे आहे.

ड्राय स्टेट बद्दल काय नियमावली आहे?

जर तुम्ही एखाद्या ड्राय स्टेट म्हणजेच एखाद्या राज्यामध्ये दारू नेण्यास बंदी आहे अशा ठिकाणी प्रवास करत असाल तर तुम्हाला त्या राज्यांमध्ये जी काही नियमावली जाहीर केलेली आहे त्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य आहे. याचा अर्थ तुम्ही त्या राज्यामध्ये प्रवास करतेवेळी दारू सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

बंदी असलेल्या राज्यात दारू कसे सेवन करू शकतो?

बंदी असलेल्या राज्याचे वेगवेगळे नियम असतात, जसे की बिहारमध्ये कुणालाच दारू पिण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर गुजरात मधील बाहेरील लोकांना दारू पिण्याची परवानगी दिली जाते परंतु त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते. म्हणूनच जर एखाद्या राज्यात बंदी असलेल्या ठिकाणी तुम्हाला दारु पिण्याची इच्छा झाल्यास अशा वेळी तुम्हाला परवानगी घेणे गरजेचे आहे. भविष्यात तुम्ही कुठे प्रवास करणार असाल आणि तुम्हाला जर दारूच्या बाटल्या सोबत न्यायच्या असतील तर अशा वेळी त्या राज्यात दारू संदर्भातील काही नियमावली आवश्य पडताळून पाहायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी

प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !

हक्काच्या कारमध्ये बसून दारू पिणं का ठरतं बेकायदेशीर? ‘हे’ आहे यामागचं नेमकं कारण!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.