AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे आपलीच म्हणून मोठ्यानं गप्पा मारताना जरा सावध बरं का, नियम वाचा… नाही तर कारवाई होऊ शकते!

रेल्वेने (Railways) प्रवास करत असताना अनेक वेळा रात्री गोंधळ आणि गाण्यांच्या आवाजामुळे आपली झोप खराब झाली असेल. कारण बरेचजण लोक ग्रुपने प्रवास करत असतात. त्यावेळी रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे हे सुरू असते. मात्र, आता प्रवाश्यांना असे करता येणार नाही. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways)  रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे आपलीच म्हणून मोठ्यानं गप्पा मारताना जरा सावध बरं का, नियम वाचा... नाही तर कारवाई होऊ शकते!
रेल्वे
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 9:48 AM
Share

मुंबई : रेल्वेने (Railways) प्रवास करत असताना अनेक वेळा रात्री गोंधळ आणि गाण्यांच्या आवाजामुळे आपली झोप खराब झाली असेल. कारण बरेचजण लोक ग्रुपने प्रवास करत असतात. त्यावेळी रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे हे सुरू असते. मात्र, आता प्रवाश्यांना असे करता येणार नाही. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways)  रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. रेल्वेने बदल केलेल्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. रेल्वेने रात्रीच्या वेळी प्रवाशांना झोपेचा त्रास लक्षात घेऊन काही मोठे बदल केले आहेत.

भारतीय रेल्वेकडून मोठे बदल

नवीन नियमानुसार रात्री उशीरा मोठ्या आवाजामध्ये कोणताही रेल्वे प्रवासी मोबाईलवर बोलू शकत नाही. तसेच मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. विशेष म्हणजे जर एखाद्या प्रवासी मोठ्या आवाजात फोनवर बोलत असेल किंवा गाणे ऐकत असेल तर रेल्वे अशा लोकांवर कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे रेल्वेमधील प्रवाशाकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्याला जबाबदार धरले जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सर्व झोनला आदेश जारी करून हे नियम तातडीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेकदा प्रवासी शेजारच्या सीटवर असलेल्या प्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्याने बोलत असल्याची तक्रार करतात. याशिवाय रात्रीच्या वेळी काही प्रवासी जोरजोरात बोलत असल्याच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. इतकेच नाहीतर रात्रीच्या वेळी रेल्वे कर्मचारी देखील गप्पा मारत असल्यामुळे झोप खराब होत असल्याच्या तक्रारी प्रवाश्यांकडून वारंवार केल्या जात आहेत. विशेष म्हणजे आता बोगीमध्ये लाईट लावण्यावरूनही नियमावली देण्यात आली आहे.

हे आहेत आता नवीन नियम

कोणत्याही प्रवाश्याला रात्री 10 नंतर मोठ्याने बोलता येणार किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकणार नाही. रात्रीच्या वेळी प्रवाश्यांची झोप खराब होऊ नये. यासाठी नाईट लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद राहतील. ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत रेल्वेमध्ये गप्पा मारत बसता येणार नाहीत.

संबंधित बातम्या : 

Budget 2022: कोरोनानं पर्यटन क्षेत्राला फटका, निर्मला सितारमण यांच्याकडून व्यावसायिकांच्या अपेक्षा काय ?

Budget 2022: डिजिटल आरोग्य सेवा ते टेलि-मेडिसिन, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला झुकतं माप?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली