AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War: मार्शल लॉ म्हणजे काय?, जो यूक्रेनने रशियाच्या हल्ल्यानंतर लगेचच लागू केलाय

Russia Ukraine War: रशिया आणि यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले आहे युक्रेनने आता आपल्या देशामध्ये मार्शल लॉ लागू केला आहे, अशातच मार्शल लॉ लागू केल्यानंतर नागरिकांच्या अधिकाऱ्यांमध्ये नेमके काय बदल होतात हे जाणून घेऊया...

Russia Ukraine War: मार्शल लॉ म्हणजे काय?, जो यूक्रेनने रशियाच्या हल्ल्यानंतर लगेचच लागू केलाय
रशिया यूक्रेन युद्ध
| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 9:24 PM
Share

गेल्या अनेक दिवसापासून रशिया आणि युक्रेन (Russia And Ukraine War) यांच्यात वाद चालू होता व या वादाचा परिणाम आता युद्धामध्ये झालेला पाहायला मिळत आहे. हल्ली दोन्ही देशांत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन सोबत युद्ध करण्याची घोषणा देखील केली आहे आणि सांगितले की, रशिया युक्रेन मध्ये लवकरच हल्ला करणार आहे.रॉयटर्स ने युक्रेनच्या एकंदरीत परिस्थिती बद्दल सांगितले की, रशिया हल्ल्यामध्ये (Russia Attack) कमीत कमी 7 लोक मारले गेले आणि 9 जण जखमी झाले आहेत तसेच रशियाच्या या हल्ल्यामुळे NATO जोरदार कारवाईच्या तयारी मध्ये लागलेला आहे म्हणूनच NATO च्या वतीने 30 सदस्य देशांकडून लवकरच रशियावर हल्ला केला जाईल. NATO रशियाविरुद्ध आर्टिकल 4 चा वापर करेल.या वादामुळे प्रत्येकाचे असे म्हणणे आहे की ही जागतिक युद्धाची सुरुवात आहे परंतु युक्रेन ने दावा केला आहे की, रशियाने केलेल्या या हल्ल्यात 300 लोक मारले गेले सोबतच असा दावा देखील केला जात आहे की, त्यांचे अनेक लष्कराचे ठिकाण उद्ध्वस्त करून टाकले आहे. युक्रेनने रशियाकडून हल्ला सुरु झाल्यानंतर युक्रेन चे राष्ट्रपती यांनी देशामध्ये मार्शल लॉ ची घोषणा केली आहे त्याचबरोबर नागरिकांना घाबरू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

अशातच अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नेमका मार्शल लॉ म्हणजे काय आणि हा कायदा लागू केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये काय बदल होतो.

मार्शल लॉ म्हणजे काय?

मार्शल लॉ म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, या काळामध्ये लष्कराचे राज्य असते. संपूर्ण समाजावर लष्कर नियंत्रण करत असते, यालाच मार्शल लॉ असे म्हणतात. मार्शल लॉ लागू केल्यानंतर लष्कराद्वारे जे काही नियम सांगितले जातात, त्या सर्व नियमांचे पालन नागरिकांना करावे लागतात. हा कायदा लष्कराद्वारे लोकांसाठी देण्यात आलेला आहे आणि या कायद्याचे पालन नागरिकांना करणे अनिवार्य असते. सध्या युक्रेनमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. अनेक देश वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये हा कायदा लागू करतात.

मार्शल लॉ कधी लागू करतात?

तसे पाहायला गेले तर मार्शल लॉ हा कायदा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकट काळामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी ,तेथील परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी लागू केला जातो त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये थेट मिलिटरी कंट्रोल असते. हल्ली युक्रेनमध्ये सगळी कडे मिलिटरीचे कंट्रोल पाहायला मिळते आहे.

जेव्हा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा देशांमध्ये मार्शल लॉ लागू केला जातो. या काळात धर्मांत नागरिकांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे मूळ अधिकार रद्द केले जातात तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य कोणतेही शोधकार्य या साऱ्या गोष्टींवर बंदी घातली जाते. बैठका,आंदोलन, राजकीय पक्ष यांच्यावर प्रतिबंध लावण्यात येतात. हा कायदा लागू केल्यानंतर बहुतांश भागांमध्ये कर्फ्यू लावला जातो. सिविल लॉ , सिविल अधिकार संपुष्टात येतात.जे लोक या कायद्याचे पालन करत नाही त्या लोकांच्या विरोधात योग्य ती कारवाई देखील या काळात दरम्यान केली जाते.

इतर बातम्या:

Russia Ukraine Crisis | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धात मध्यस्थी करावी, यूक्रेनची विनंती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 160 अब्ज पौंड संपत्तीचे मालक; अलिशान कारची संख्या ऐकून थक्क व्हाल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.