AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळ अथवा भाजीपाल्याला लागला सापाचा दात… खाणाऱ्याचा मृत्यू होणार? व्हायरल दाव्याचे सत्य काय?

Snake Bite on Vegetables Result: साप हा शेतात आणि रानावनात फिरतो. फळ आणि भाज्यांना सापाचे विषारी दात लागले आणि ते माणसाने खाल्ले तर काय होईल? खाणाऱ्याचा मृत्यू होईल का? काय आहे या प्रश्नांचं उत्तर?

फळ अथवा भाजीपाल्याला लागला सापाचा दात... खाणाऱ्याचा मृत्यू होणार? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
सापाच्या विषाने भाजपीला होतो खराब?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 4:22 PM
Share

Snake Bite on Vegetables Result: साप पाहिला तरी अनेकांचा घाबरगुंडी उडते. सापाला पाहून काही जण पळ काढतात. तर काही जणांची बोबडी वळते. बिनविषारी सापाने दंश केला तरी धक्क्याने अनेकांचा मृ्त्यू ओढावतो. साप हा रानोमाळी फिरतो. तो शेतातही आढळतो. तो फळांच्या झाडावरही दिसतो. अशावेळी जर सापाने एखाद्या फळाला दंश केला. शेतातील भाजीपाल्याला सापाचा विषारी दात लागला, तर भाजीपाला, फळं विषारी होतात का? त्याने माणसाचा मृत्यू होतो का? काय आहे याविषयीचे सत्य?

सापाने दंश केल्याने भाजपील्यात उतरते विष?

जर सापाने काकडी, भोपळा वा इतर फळांना दंश केला, त्याचे दात भाजीपाला अथवा फळाला लागला तर ते विषारी होतात का? हा अन्नघटक मनुष्याच्या पोटात गेला तर त्याचा मृत्यू होतो का? तज्ज्ञांचे मते त्याचे दुष्परिणाम अत्यंत कमी असतात. त्यामागील काही कारणंही समोर आली आहेत.

1. विषाची परीक्षा: तर सापाचे विष हे Venom असते. ते Poison नसते. म्हणजे सापाचे विष तेव्हाच घातक ठरते, जेव्हा ते थेट मनुष्याच्या रक्तात मिसळते. जेव्हा साप एखाद्या फळावर विषाचा घटक सोडतो, तेव्हा त्याचा परिणाम तितका होत नाही. तज्ज्ञांच्या मते पोटातील रसायनं त्याला पचवून टाकतात. पण जर तोडात अथवा ओठांना, गळ्यात अथवा पोटात जखम असेल तर मात्र वेगळा परिणाम होऊ शकतो.

2. संपूर्ण फळ खराब होत नाही: फळ अथवा भाजीपाला हा लागलीच संपूर्णपणे खराब होत नाही. सापाचे विष जरी फळाला लागले तरी एक भाग खराब होतो अथवा त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होते. हे विष फळाच्या आतपर्यंत पोहचत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

3. साप शक्यतो उंदीर, बेडूक, सस्तन प्राणी, पक्षी यांच्यावर प्रतिक्रिया देतो. भीतीपोटी तो हल्ला चढवतो. पण भाजीपाला, फळं यावर तो असा हल्ला करत नाही. त्यामुळे सापाचे विष फळाला लागून एखाद्याचा मृत्यू झाल्याची घटना अजून समोर आलेली नाही. भाजीपाला, फळं घरी आल्यावर ती धुतल्या जातात. भाजी शिजवल्या जाते. त्यामुळे बरेच विषारी घटक निघून जातात.

4. सापाने माणसाला दंश केला तर त्याचे विष हे मानवी शरिरात भिनते. विषाचा परिणाम हा तेव्हाच होतो, जेव्हा रक्तवाहिन्यांतून ते शरीरात भिनते. अनेक जण विषारी औषध घेऊन जीवन संपवतात. ते विष आणि सापाच्या विषात फरक आहे. फळ वा भाजीपाल्यावाटे ते विष मानवी शरीराला अपाय पोहचवू शकत नाही.

5. तज्ज्ञांच्या मते, सापाच्या विषामुळे भाजीपाल्याचा रंग, चव अथवा इतर कोणत्या घटकावर फारसा परिणाम दिसत नाही. त्यामुळे त्यावर सापाचे विष लागलेले आहे हे डोळ्यांनी दिसत नाही. साप जरी शेतातून फिरत असला तरी त्याचे विष भाजीपाल्याला लागत नाही.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल