मुंबई : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक मोठं विधान केलंय. आज पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) पहिला दिवस आहे. यावेळी त्यांना राज्य सरकारवर टीका केली. याचवेळी आदित्य ठाकरे यांनी एक मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार लवकरच कोसळेल. जे शिंदे गटासोबत गेले तिथे निष्ठेला कुठेही स्थान नाही. जे एकानाथ शिंदे गटासोबत गेले. त्यांचंच अवघड झालंय, असं माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगत एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचं विधान केलंय. तर यावेळी त्यांनी दहिहंडी सणावरही भाष्य केलंय. ‘कोरोनानंतर (Corona) हा सण साजरा करता येत असल्यानं यामध्ये कोणतंही राजकारण येणार नाही, असंही माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.