AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुलवामातील बलिदान ना विसरलो, ना विसरणार : अजित डोभाल

गुरुग्राम : “पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देश विसरलेला नाही आणि विसरणारही नाही”, असे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी केलं. दहशतवादाचा सामना करण्यात देशाचं नेतृत्व सक्षम आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे, आम्ही काय केलं आणि आम्ही काय करु हे सर्व निर्णय घेण्यासाठी सरकार सक्षम असल्याचंही डोभाल म्हणाले. सीआरपीएफचा 80 वा […]

पुलवामातील बलिदान ना विसरलो, ना विसरणार : अजित डोभाल
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

गुरुग्राम : “पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देश विसरलेला नाही आणि विसरणारही नाही”, असे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी केलं. दहशतवादाचा सामना करण्यात देशाचं नेतृत्व सक्षम आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे, आम्ही काय केलं आणि आम्ही काय करु हे सर्व निर्णय घेण्यासाठी सरकार सक्षम असल्याचंही डोभाल म्हणाले.

सीआरपीएफचा 80 वा स्थापना दिन आज सारजा करण्यात आला. यावेळी डोभाल यांनी परेडचं निरिक्षण केलं. त्यानंतर डोभाल यांनी जवानांना संबोधित केलं. गुरुग्रामच्या कादरपूर येथे सीआरपीएफच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमी आणि ग्रुप सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित डोभाल हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात त्यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि देशासाठी सीआरपीएफचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचं सांगितलं.

“अंतर्गत सुरक्षेचं खूप महत्त्व असतं. दुसऱ्या महायुद्धानंतर 37 देश विभक्त झाले होते, ते त्यांचं सार्वभौमत्व गमावून बसले होते. यापैकी 28 देश विभक्त होण्याचं कारण अंतर्गत संघर्ष होता. कुठलाही देश कमकुवत असण्यामागे त्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेमधील उणीवा कारणीभूत असतात. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफची आहे, त्यामुळे तुमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे हे तुम्हाला कळालंच असेल”, असे डोभाल म्हणाले. तसेच सरकारचा सीआरपीएफवर खूप विश्वास आहे, असेही अजित डोभाल म्हणाले.

पुलवामा हल्ला :

14 फेब्रुवारीला श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी हायवेवर गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोटकं भरुन त्यात हा स्फोट घडवून आणला. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.