AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली.

राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
| Updated on: Feb 15, 2020 | 8:36 PM
Share

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली (Anil Deshmukh annouce Police recruitment). मागील सरकारने गेल्या 5 वर्षात पोलीस भरती केली नाही. मात्र, आम्ही पोलिसांच्या 8 हजार जागा भरणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. यासोबत 7 हजार सिक्युरिटी गार्डची भरती करणार असल्याचीही घोषणा गृहमंत्री देशमुख यांनी केली.

अनिल देशमुख म्हणाले, “मागील सरकारने गेल्या 5 वर्षात पोलीस भरती केली नाही. मात्र, आम्ही पोलिसांच्या 8 हजार जागा आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार आहोत. तसेच बलात्कार गुन्ह्यांबाबत आंध्र प्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचाही आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी 20 फेब्रुवारीला मी स्वतः आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे. हिंगणघाटसारख्या घटना रोखता याव्यात यासाठी आंध्रप्रदेशमधील कायदा महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

राज्य सरकार कोरेगांव भीमा प्रकरणाचा तपास करत होतं. जर हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) द्यायचा होता, तर केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते. मात्र, तसं झालं नाही. एनआयएचा तपास सुरु असताना समांतरपणे विशेष तपास पथकाची (SIT) स्थापन करता येते का याचा कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. जर कायदेशीर तरतूद असेल तर भीमा कोरेगावप्रकरणी एसआयटीची स्थापन करू, असंही अनिल देशमुख यांनी नमूद केलं.

विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आगामी काळात पुण्यात दीड ते दोन लाख सीसीटीव्ही बसवणार असल्याचीही घोषणा केली. देशमुख यांनी यावेळी फोन टॅपिंगवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “फोन टॅपिंग प्रकरणी आम्ही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल आला की याबाबत माहिती दिली जाईल. जळगावच्या भाजप नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे त्यांच्या पण नेत्याच्या फोन टॅपिंगसंदर्भात चौकशी करण्याचा आग्रह केला. आहे. त्याचाही विचार करु.”

NRC आणि CAA मुळे महाराष्ट्रात कुठल्याही नागरिकाचे नागरिकत्व जाऊ देणार नसल्याचंही देशमुख यांनी नमूद केलं. देशमुख यांनी शरद पवार यांचं पत्र मिळालं असून त्याबाबत अधिकाऱ्याना सूचना केल्याची माहिती दिली.

“शरद पवारांनी दोन महिने आधीच गृहमंत्रिपद देणार असल्याचं सांगितलं होतं”

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यातील आपल्या प्रकट मुलाखतीत त्यांच्या गृहमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “गृहखाते मिळणार याबाबत शरद पवार यांनी मला दोन महिने आधी नागपूरचं अधिवेशन सुरु असतानाच सांगितलं होतं.”

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh annouce Police recruitment

Follow Us
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.