उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलवलं, बीडच्या शेतकऱ्याचं कर्ज काही तासात माफ

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीडमधील सभेत त्यांनी एका शेतकऱ्याला स्टेजवर बोलावलं, ज्याचं कर्ज अजूनही माफ झालेलं नाही. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला कर्जमाफीचं पत्र देण्यात आलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावल्यानंतर काही तासातच या शेतकऱ्याचं कर्ज बँकेकडून माफ करण्यात आलं. राज्य सरकारने दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. […]

उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलवलं, बीडच्या शेतकऱ्याचं कर्ज काही तासात माफ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीडमधील सभेत त्यांनी एका शेतकऱ्याला स्टेजवर बोलावलं, ज्याचं कर्ज अजूनही माफ झालेलं नाही. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला कर्जमाफीचं पत्र देण्यात आलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावल्यानंतर काही तासातच या शेतकऱ्याचं कर्ज बँकेकडून माफ करण्यात आलं.

राज्य सरकारने दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. पण अजूनही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. उद्धव ठाकरेंनी या कर्जमाफीचा समाचार घेत, हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडून शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा वाटपही करण्यात आलंय.

उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावताच बँक खडबडून जागी झाली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी यानंतर काही वेळातच बाळासाहेब हरिभाऊ सोळंके या शेतकऱ्याला फोन केला आणि तुमचं कर्ज माफ झालंय असं सांगितलं. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बँकाच टाळाटाळ करतात का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, सहकार मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, काही महिने अगोदरच या शेतकऱ्याची रक्कम बँकेकडे जमा करण्यात आली आहे.

सहकारमंत्र्यांचं स्पष्टीकरण

“उद्धव ठाकरेजी यांनी बीडच्या सभेत ज्या शेतकर्‍याला उभे केले होते, त्यांच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर 2018 मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आलेले आहेत,” असं स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून देण्यात आलंय. त्यामुळे बँकांच्या विलंबामुळेच शेतकऱ्यांना अजून पैशांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं समोर आलंय.

बाळासाहेब हरिभाऊ सोळंके असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. 2014 मध्ये त्यांनी कर्ज घेतल्यानंतर हे खातं एनपीए झालं. एनपीए खात्यांसंदर्भात काय करायचे, याचा निर्णय राज्यस्तरिय बँकर्स समितीत आधीच घेण्यात आला आहे. त्यानुसार, पूर्णपणे बुडित निघालेल्या खात्याला पुनरूज्जीवित करण्यासाठी सरकारने किती योगदान द्यायचे, याचे सूत्र त्यात ठरविण्यात आले. त्यानुसार, या शेतकर्‍याचे 98,687 इतक्या रूपयाचे खाते एनपीए खाते पुन्हा त्या शेतकर्‍याला बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी 58,493 रूपयांचे योगदान शासनाकडून देण्यात आले. त्यामुळे सदर शेतकर्‍याचे खाते पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल. सरकारकडून ही रक्कम बँकेला जरी देण्यात आली असली तरी याच एनपीए अकाऊंटसंदर्भातील करारानुसार, शेतकर्‍याचे संपूर्ण 98,687 रूपये माफ झालेले आहे, असंही सुभाष देशमुख यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.