AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोरोना’मुळे बारामतीत पहिला बळी, भाजी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील समर्थनगर भागातील भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. त्याच्या कुटुंबातल्या एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाली (Baramati Vegetables Seller Corona Death)

'कोरोना'मुळे बारामतीत पहिला बळी, भाजी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 09, 2020 | 11:13 AM
Share

बारामती : ‘कोरोना’ची लागण झालेल्या बारामतीमधील भाजी विक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या रुग्णाच्या मुलगा-सून आणि दोघी नातींनाही ‘कोरोना’ झाला आहे. (Baramati Vegetables Seller Corona Death)

बारामतीत एकाच कुटुंबातल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून तालुक्यात कोरोनाचे आता 6 रुग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा 73 वर गेला आहे. पुण्यात कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून यातील एक बारामतीचा 1 आहे. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते.

दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील समर्थनगर भागातील भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. संबंधित भाजी विक्रेता गेल्या चार महिन्यांपासून पॅरालिसीसमुळे घरातच होता. दोन दिवसांपूर्वी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या आजूबाजूचा 5 किमीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला होता.

या रुग्णापाठोपाठ त्याचा मुलगा, सून आणि दोन नातींनाही झाली कोरोनाची लागण झाली आहे. परवा मुलगा-सुनेचे अहवाल आले होते, तर काल एक आणि आठ वर्षांच्या नातीला ‘कोरोना’ झाल्याचं समजलं होतं. उपचार सुरु असताना ज्येष्ठ नागरिकाचे निधन झालं.

याआधी बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्या रुग्णाशी संबंधित व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र भाजी विक्रेत्या कुटुंबाला कोरोना झाल्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले. आता त्याचा मृत्यू झाल्याने धाकधूक वाढली आहे.

बारामतीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीत भिलवाडा पँटर्न राबवण्याचे जाहीर केले आहे. सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची  बैठक घेऊन त्यात याबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बारामतीसह राज्यात कोरोना हातपाय पसरत असतानाही नागरिकांना गांभीर्य समजत नसल्याने अजित पवार संतप्त झाले होते.

(Baramati Vegetables Seller Corona Death)

Follow Us
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?