AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी

कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच महात्मा सोसायटीच्या परिसरात अनेक बघ्यांनी गर्दी केली आहे. | Pune bison

कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी
| Updated on: Dec 09, 2020 | 10:42 AM
Share

पुणे: एरवी सांस्कृतिक आणि राजकीय कारणांमुळे कायम प्रकाशझोतात असणारे पुणे बुधवारी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले. पुण्याच्या कोथरुडमध्ये एक रानटी गवा फिरताना आढळून आला आहे. येथील महात्मा सोसायटीच्या परिसरात या गव्याचा वावर आहे. (Wild animals in Pune)

कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच महात्मा सोसायटीच्या परिसरात अनेक बघ्यांनी गर्दी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या रानटी गव्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये हा रानटी गवा काहीसा भेदरलेला दिसत आहे. वनविभागाला या प्रकाराची वर्दी देण्यात आली असून थोड्याचेवळात त्यांचे पथक याठिकाणी दाखल होईल.

मात्र, कोथरूडसारख्या शहरी भागात रानटी गवा आलाच कसा, असा बुचकाळ्यात टाकणारा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता वनविभागाने या गव्याला पकडल्यानंतर कदाचित या सगळ्याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील रस्त्यांवरही दिसले होते जंगली प्राणी

यापूर्वी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मुंबईतही जंगलालगत असणाऱ्या परिसरात जंगली प्राणी आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी नागरिक घरात बंदिस्त झाल्याने रस्त्यांवरील वर्दळ अचानक थांबली होती. त्यामुळे मुंबईत कधी नव्हे ती इतकी चिडीचूप शांतता अनुभवायला मिळत होती.

परिणामी जंगलातील प्राणी मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना आढळून आले होते. दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर या काळात मोर अनेकदा स्वच्छंदपणे विहार करताना दिसले होते. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही हरिणांचे कळप मुक्तपणे वावरताना दिसत होते. याशिवाय, मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन मासे फिरताना आढळून आले होते.

संबंधित बातम्या:

तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू

(Wild animals in Pune)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.