AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा रोखणार नाही, तरी आंदोलन 26 जानेवारीपर्यंत सुरु ठेवू, शेतकरी नेत्याचा इशारा

आंदोलनादरम्यान दिल्लीला पुरवले जाणारे अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा रोखला जाणार नाही, असं किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत स्पष्ट केलं (BKU national spokesperson Rakesh Tiket on Farmers Protest).

जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा रोखणार नाही, तरी आंदोलन 26 जानेवारीपर्यंत सुरु ठेवू, शेतकरी नेत्याचा इशारा
| Updated on: Dec 02, 2020 | 5:07 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन 26 जानेवारीपर्यंत चालू राहील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’सोबत बोलताना दिला. या आंदोलनादरम्यान दिल्लीला पुरवले जाणारे अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा रोखला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं (BKU national spokesperson Rakesh Tiket on Farmers Protest).

“सरकार एवढ्या लवकर ऐकणार नाही. आम्ही 26 जानेवारीचा टार्गेट लक्षात घेऊन आंदोलन करत आहोत. कारण त्याआधी सरकार मागण्या मान्य करण्याची शक्यता कमी आहे. 30 वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांनी ज्याप्रकारे आंदोलन केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे हे आंदोलन केलं जाईल’, असं राकेश टिकैत म्हणाले.

“अजूनही अनेक शेतकरी दिल्लीत येणार आहेत. सरकारसोबत बातचित सुरु राहील. केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर शेतकरी देखील शांत बसणार नाहीत”, असं देखील राकेश टिकैत यांनी सांगितलं (BKU national spokesperson Rakesh Tiket on Farmers Protest).

कृषी कायदा आणि इतर मागण्यांसाठी पंजाब आणि हरयाणा राज्यातील शेतकरी शेकडोच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले आहेत. गेल्या सात दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मंगळवारी (1 डिसेंबर) केंद्र सरकारसोबत बैठक पार पडली. ही बैठक जवळपास तीन तास चालली. मात्र, या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पुन्हा गुरुवारी (3 डिसेंबर) बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

दरम्यान, “केंद्र सरकारसोबत गुरुवारी होणाऱ्या बैठकीत MSP पेक्षा कमी किमतीत शेतीचा माल विकला जाऊ नये, शेतकऱ्याचा काही वाद झाल्यास त्याला कोर्टात धाव घेता यावी, अशाप्रकारच्या काही मागण्या सरकारकडे करु. त्याचबरोबर शेतीमालाच्या आयात आणि निर्यातीवर नियंत्रण कोण ठेवेल? असा सवाल आम्ही करु”, असं राकेश टिकैत यांनी सांगितलं.

हेही वाचा :

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक निष्फळ; आंदोलन सुरुच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.