AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India China face off : गलवान संघर्षावर भेकड चिनी प्रवक्त्यांचा नवा दावा

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षावर चीनने पुन्हा एकदा भारतालाच दोषी ठरवलं आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops).

India China face off : गलवान संघर्षावर भेकड चिनी प्रवक्त्यांचा नवा दावा
| Updated on: Jun 18, 2020 | 5:24 PM
Share

मुंबई : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षावर चीनने पुन्हा एकदा भारतालाच दोषी ठरवलं आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops). गलवान संघर्षावर चीनकडून वारंवार वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. या सर्व दाव्यांमध्ये भारतालाच दोषी ठरवलं जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी आज ट्विटरवर आपली प्रतिक्रिया जारी करत भारताने चिनी सैन्याला कमी लेखू नये, असा इशारा दिला आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops).

“भारतीय सैनिकांनी वास्तविक नियंत्रण रेषा पार करत नियमांचं उल्लंघन केलं. याशिवाय त्यांनी चिनी सैनिक आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. भारताने वस्तुस्थितीचा चुकीचा अर्थ काढू नये. याशिवाय भारताने चिनी सेनेला कमी लेखू नये”, असं हुआ चुनयिंग म्हणाल्या आहेत.

भारत-चीन संघर्षावर चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनीदेखील काल (17 जून) भारताला दोषी ठरवलं होतं. “गलवान आमचंच आहे, भारतानं सैन्याला शिस्तीत ठेवावं आणि भारतानं रुळावर यावं”, असं झाओ लिजैन म्हणाले होते. त्यापोठोपाठ आज हुआ चुनयिंग यांनी भारताला दोषी ठरवलं. दरम्यान, परिस्थिती शांत करण्यासाठी दोन्ही देश तयार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली आहे.

या संघर्षावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दोषी ठरवलं आहे. चीनने नियोजन करुन ही घटना घडवून आणली, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. याप्रकरणी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवर बोलून त्यांची कानउघाडणी केली.

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी चीनला भारत जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं ठणकावून सांगितलं. “भारताचे वीर जवान लढता लढता शहीद झाले आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नाही”, असं मोदी म्हणाले. याशिवाय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं म्हटलं आहे.

संबंधित बातमी :

India-China Face Off | लडाखमध्ये 3 इन्फन्ट्री तैनात, हिमाचलमध्येही अतिरिक्त तुकडी, चिनी संघर्षानंतर सीमेवर भारताचे किती सैन्य?

गलवान आमचंच, भारताने रुळावर यावं, चीनची गुर्मी कायम

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.