कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं, जूनमध्ये शाळा-कॉलेज सुरु करण्याचा विचार : मुख्यमंत्री

आमची कोरोनासोबत जगायची तयारी आहे, पण त्याची तयारी आहे का आम्हाला जगू द्यायची," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  (CM Uddhav Thackery on re-opening School College)

कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं, जूनमध्ये शाळा-कॉलेज सुरु करण्याचा विचार : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 10:01 PM

मुंबई : महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट मला पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  (CM Uddhav Thackery on re-opening School College)

“जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्ष. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की हे संकंट पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे त्यापूर्वी संपवायला पाहिजे. जून महिना सुरु केल्यानंतर शाळा कॉलेज सर्व सुरु करायचं,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरु होणार, काहींच्या परीक्षा राहिल्या आहे. शैक्षणिक वर्ष कसं सुरु करणार, शाळा कशा सुरु करणार, परीक्षा कशा होणार, ऑनलाईन सुरु करणार की प्रत्यक्ष शाळा सुरु करणार, हे सर्व मोठे विषय आहेत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  (CM Uddhav Thackery on re-opening School College)

“मला कोणत्याही परिस्थिती शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही. ते वाया जाऊ देऊ शकत नाही. त्यामुळे शाळा कशा सुरु करायचं, त्याच्या खबरदारी काय घ्यायची. शाळा, कॉलेजमध्ये अॅडमिशन करायच्या. कुठे काय करायचं याचा विचार सुरु आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“कोरोनासोबत जगायला शिका असं म्हटलं जात आहे. आमची कोरोनासोबत जगायची तयारी आहे, पण त्याची तयारी आहे का आम्हाला जगू द्यायची,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  (CM Uddhav Thackery on re-opening School College)

“राज्यात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. परप्रांतिय मजूर गावी गेले आहेत, जर मजुरांचा तुटवडा जाणवत असेल तर महाराष्ट्राला आत्मनिर्भर करण्यासाठी भूमिपुत्रांनी समोर यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच त्यांनी कोरोनाचं हे संकट पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे, असा निर्धारही बोलून दाखवला. मात्र त्याचवेळी त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला कळकळीची विनंती केली .”

मला कोविड योद्धा हवे- उद्धव ठाकरे

“मला अजूनही कोविड योद्धा हवे आहेत, पोलीस थकतात, आजारी पडतात, गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दोन पोलीस शहीद झालेत. डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्या त्या वेळी विश्रांती देणे गरजेचे आहे, त्यामुळे मला कोव्हिड योद्ध्यांची गरज आहे, ज्यांना कुणाला मदतीला यायचं आहे त्यांचं स्वागत आहे.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

भूमिपुत्रांनी पुढे या, आपला महाराष्ट्र आपल्या पायावर उभा करु – मुख्यमंत्री

मुंबई-पुण्यातून कोकणात, प. महाराष्ट्रात जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.