AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिल्लाच्या मृत्यूचा बदला घेणारा कावळा, तीन वर्षांपासून पाठलाग, डोक्यात टोचे

माणूस माणसाचा बदला घेतो हे तुम्हाला माहिती असेल, पण एखादा पक्षी माणसाचा बदला घेतो हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? पण पक्षीही माणसाचा बदला घेतात अशी घटना समोर आली आहे.

पिल्लाच्या मृत्यूचा बदला घेणारा कावळा, तीन वर्षांपासून पाठलाग, डोक्यात टोचे
| Edited By: | Updated on: Sep 03, 2019 | 1:45 PM
Share

भोपाळ (मध्य प्रदेश) : माणूस माणसाचा बदला घेतो हे तुम्हाला माहिती असेल, पण एखादा पक्षी माणसाचा बदला घेतो हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? पण पक्षीही माणसाचा बदला घेतात अशी घटना समोर आली आहे. एक कावळा गेल्या तीन वर्षांपासून एका व्यक्तीवर सतत हल्ला करत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील आहे.

शिवपुरी जिल्ह्यातील बदरवास जनपद क्षेत्रातील शिवा केवट यांच्यावर गेल्या तीन वर्षांपासून कावळ्यांचा झुंड हल्ला करत आहे. जेव्हाही शिवा घराबाहेर पडतो तेव्हा कावळे त्याच्यावर हल्ला करतात.

कधी-कधी कावळे शिवाच्या डोक्याला चोच मारुन जखमी करतात. त्यामुळे शिवा आपल्या सुरक्षेसाठी आता काठी घेऊन फिरतो किंवा रात्री अंधाराच्या वेळी तो घरातून बाहेर पडतो.

कावळे हल्ला करण्यामागचे कारण काय?

तीन वर्षापूर्वी आपल्या गावावरुन बदरवास येत असताना रस्त्यात मला एक कावळ्याचे पिल्लू जाळीमध्ये अडकलेले दिसले. त्यातून त्याची सुटका करण्यासाठी मी प्रयत्न केले, पण दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला. तेव्हा पासून कावळे माझ्यावर हल्ला करत आहेत, असं शिवाने सांगितले.

सुरुवातीला कावळे माझ्यावरती हल्ला का करत आहे याची मला कल्पना आली नाही. पण त्यानंतर मला आठवले की, माझ्याकडून कावळ्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याने कावळे माझ्यावर हल्ला करतात, असं शिवाने सांगितले.

तज्ज्ञांचे मत काय?

कावळ्यांमध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती असते. जर त्यांना कुणी त्रास देत असेल, तर त्यांचा चेहरा ते लक्षात ठेवतात. कारण त्यांची बुद्धी तल्लख असते, असं पक्षी आणि प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या बरकतउल्ला विद्यापीठातील प्राध्यापक आलोक कुमार यांनी सांगितले.

कावळ्यांचे डोकं इतर पक्षांपेक्षा तुलनेने मोठं असते. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. ते सहजपणे माणसाचा चेहरा लक्षात ठेवतात आणि अनेक वर्ष ते विसरत नाहीत, असं  मत एका दुसऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.