AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sucess Story | नैराश्याने शांतता हिरावली, आत्महत्येचे विचार, आत्मविश्वास जिंकला आणि तो IPS झाला

देशातील प्रतिष्ठित आयआयटी दिल्लीतून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पण, त्याच्या आत्मविश्वास डळमळीत झाला होता. आत्महत्येचे सतत विचार मनाय येत होते. मात्र, त्यांनी त्यावर विजय मिळविला आणि देशातील सर्वात कठीण परीक्षा पास झाले.

Sucess Story | नैराश्याने शांतता हिरावली, आत्महत्येचे विचार, आत्मविश्वास जिंकला आणि तो IPS झाला
IPS AMIT LODHAImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jun 26, 2024 | 7:15 PM
Share

जर स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते असे म्हणतात. एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आयपीएस अधिकारी अमित लोढा यांची जीवनकहाणी काहीशी अशीच आहे. अनेक नक्षलवादी टोळ्यांचा खात्मा करणारे आयपीएस अमित लोढा यांच्याही आयुष्यात अशी एक वेळ आली होती. नैराश्याला बळी पडून ते स्वतःचे जीवन संपवायला निघाले होते. सतत आत्महत्येचा विचार मनात येत होता. पण, त्यांनी धैर्य दाखवले. स्वतःचा आत्मविश्वास वाढविला. याच विश्वासाच्या बळावर त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले.

आयपीएस अमित यांचे शालेय शिक्षण जयपूरच्या सेंट झेवियर्स स्कूलमधून झाले. त्यांनंतर त्यांनी दिल्लीत आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. आयआयटीमध्ये शिकत असताना अमित यांच्या धाडसाला वाव मिळाला. गणित विषयात त्याची कामगिरी सातत्याने घसरत होती. या खराब कामगिरीमुळे त्यांचे सहकारी दुरावू लागले. त्यांच्याकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे अमित दुखावला. तो हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. त्यामुळे अभ्यासातील कामगिरी आणखीनच खालावत गेली. पण, त्याने हार मानली नाही. स्वतःवरचा आत्मविश्वास कायम ठेवला. जोमाने अभ्यास केला आणि गणितामध्ये अव्वल आला.

यूपीएससीच्या तयारीदरम्यान अमित लोढा यांनी मुख्य विषय गणित हाच निवडला. ज्या विषयामुळे त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले होते तोच विषय निवडून त्यांनी सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. अमित यांनी UPSC परीक्षेत गणितात चांगले गुण तर मिळवलेच शिवाय चांगले रँक मिळवून आत्मविश्वास पक्का असेल कुठलेही क्षेत्र लांब रहात नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.

UPSC परीक्षा पास झाल्यांनतर आयपीएस म्हणून ते रुजू झाले. त्यांची कारकीर्द कधी गोड तर कधी आंबट अनुभवांनी पुढे जात होती. 2005 मध्ये त्यांना बिहारमध्ये शेखपुरा या नव्याने तयार झालेल्या जिल्ह्यात पाठवण्यात आले. जिथे त्यांना महातो टोळीशी मोठा सामना करावा लागला. परंतु, अंगी असलेले शहाणपणा आणि शौर्य यामुळे त्यांनी त्या टोळीचा अध्यायच बंद केला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. या टोळीला मंशेष केल्यांनतर बिहारमध्ये त्यांना सुपर कॉप म्हणून ओळखले जाऊ लागले. आज त्यांची गणना बिहारच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. UPSC उत्तीर्ण करण्यासाठी एक वेळापत्रक बनवले आणि त्याचे पालन करून परीक्षेत यश मिळवले, असे ते सांगतात.

Follow Us
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं