राहुल गांधी सीरिअस राजकारणी नाहीत, ते पिकनिकला जातात, राजदला ठाऊक नव्हतं? : देवेंद्र फडणवीस

"बिहार सरकारचा आणखी विस्तार होईल. अनेक जण शपथ घेतील. तरुण पिढीला संधी द्यायची ही भाजपची कार्यपद्धत आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis slams Rahul Gandhi).

राहुल गांधी सीरिअस राजकारणी नाहीत, ते पिकनिकला जातात, राजदला ठाऊक नव्हतं? : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 8:18 PM

पाटणा : “काँग्रेस नेते राहुल गांधी हे पिकनिकला नेहमी जातात. याबाबत राजदला माहिती नव्हतं का? खरंतर राहुल गांधी सिरिअस राजकारणी नाहीतच, ते राजदलाही माहीत आहे. पण आता अपयशाचं खापर राहुल गांधींवर फोडलं जात आहे”, असा टोला बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला (Devendra Fadnavis slams Rahul Gandhi).

जेडीयू नेते नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या 14 नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज पाटण्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या शपथविधी कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘एएनआय’ला प्रतिक्रिया दिली.

“बिहार सरकारचा आणखी विस्तार होईल. अनेक जण शपथ घेतील. तरुण पिढीला संधी द्यायची ही भाजपची कार्यपद्धत आहे”, असं ते म्हणाले (Devendra Fadnavis slams Rahul Gandhi).

बिहारमध्ये राजद आणि काँग्रेस हे महागठबंधनचे महत्त्वाचे पक्ष होते. यापैकी राजद 75 जागांवर विजय मिळवून बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला. पण काँग्रेस 70 पैकी फक्त 19 जागांवर विजयी झाले. तर इतर मित्रपक्षांना 16 जागा मिळाल्या. त्यामुळे महागठबंधनची घोडदौड फक्त 110 जागांवर थांबली. तर भाजपप्रणित एनडीएला 125 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे बिहारमध्ये आज एनडीएचे सरकार स्थापन झाले.

बिहारमध्ये काँग्रेसने आणखी मेहनत केली असती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं, असं राजदच्या काही नेत्यांचं मत आहे. राजदचे नेते ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी तर बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता स्थापन न होण्यामागे काँग्रेसच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

“काँग्रेस पक्ष महागठबंधनसाठी बाधा बनला आहे. काँग्रेसच्या 70 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण काँग्रेसने 70 प्रचारसभादेखील घेतल्या नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले. प्रियांका गांधी यांना बिहार एवढा परिचित नाही, त्यामुळे त्यादेखील आल्या नाहीत”, अशी टीका शिवानंद तिवारी यांनी केली

“बिहारमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं होतं, पण काँग्रेस नेते राहुल गांधी शिमल्यात त्यांची बहीण आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या घरी पिकनीला गेले होते. पक्ष असा चालतो का? काँग्रेस पक्ष जशाप्रकारे चालवला जात आहे त्याचा भाजपला फायदा होत आहे”, असा घणाघात शिवानंद तिवारी यांनी केला होता.

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.