गडचिरोली : ‘गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी आदिवासी आणि स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असतांना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समितीचा प्रयत्न चुकीचा आहे’, असं मत महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र पाठवलं आहे. यात दारूबंदी अधिक कठोर करण्याचं आवाहन केलं आहे (Dr Abhay Bang and Dr Rani Bang on Alcohol Ban and Maharashtra Government Policy).