AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोरदार ये रे ये रे पावसा, सोलापूरकरांची आर्त हाक

वरुण राजाने जिल्ह्यात काहीशी हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही पिकांना जीवनदान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी पिकांना जीवनदान देणारा पाऊस कधी येणार याच्याच  प्रतिक्षेत आहे.

जोरदार ये रे ये रे पावसा, सोलापूरकरांची आर्त हाक
| Updated on: Aug 05, 2019 | 7:19 PM
Share

सोलापूर : राज्याच्या अनेक भागात पावसामुळे हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे सोलापूरमध्ये अजूनही पावसाच्या दमदार आगमनाची प्रतिक्षा कायम आहे. आज (सोमवार) वरुण राजाने जिल्ह्यात काहीशी हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही पिकांना जीवनदान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी पिकांना जीवनदान देणारा पाऊस कधी येणार याच्याच  प्रतिक्षेत आहे.

दररोज हुलकावणी देणाऱ्या ढगामधून अखेर आज जिल्ह्यात पाऊस बरसला. मात्र, तोही केवळ शहराच्या हद्दीत काही मिनिटांसाठीच पडला. ग्रामीण भागात अगदी शिंतोड्याप्रमाणे पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसला असला तरी पेरणीसाठी आणि पेरलेले उगवण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मनातील दुःख कायम आहे.

सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण जून आणि जुलै  महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्या झाल्या नाही. ज्यांनी आज ना उद्या होईल या भरवशावर पेरणी केल्या, त्यांची पेरणी पावसाने दडी मारल्याने वाया गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेही संकट ओढावले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 40 टक्के इतकाच पाऊस आहे. मात्र, गेल्या 2 दिवसात 6 ते 7 मिनिटे इतकाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगल्या पावसाची आशा कायम असली, तरी त्यांची चिंता कायम आहे.

या सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे  जिल्ह्याची वरदायिनी असलेले  उजनी धरणं मात्र 73 टक्के भरलं आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात सोलापूर शहरासह उजनी धरणावर अवलंबून असलेल्या गावांची तहान भागणार आहे. मात्र, आजही जिल्यातील 150 हून अधिक गावांमध्ये 183 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 270 चारा छावण्यांमध्ये बळीराज्याचे पशुधन आश्रयाला आहे. त्यामुळे आमच्या शिवारात पुणे मुंबई सारखा पाऊस कधी पडणार असाच प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे.

Follow Us
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.