AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोरदार ये रे ये रे पावसा, सोलापूरकरांची आर्त हाक

वरुण राजाने जिल्ह्यात काहीशी हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही पिकांना जीवनदान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी पिकांना जीवनदान देणारा पाऊस कधी येणार याच्याच  प्रतिक्षेत आहे.

जोरदार ये रे ये रे पावसा, सोलापूरकरांची आर्त हाक
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 05, 2019 | 7:19 PM
Share

सोलापूर : राज्याच्या अनेक भागात पावसामुळे हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे सोलापूरमध्ये अजूनही पावसाच्या दमदार आगमनाची प्रतिक्षा कायम आहे. आज (सोमवार) वरुण राजाने जिल्ह्यात काहीशी हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही पिकांना जीवनदान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी पिकांना जीवनदान देणारा पाऊस कधी येणार याच्याच  प्रतिक्षेत आहे.

दररोज हुलकावणी देणाऱ्या ढगामधून अखेर आज जिल्ह्यात पाऊस बरसला. मात्र, तोही केवळ शहराच्या हद्दीत काही मिनिटांसाठीच पडला. ग्रामीण भागात अगदी शिंतोड्याप्रमाणे पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसला असला तरी पेरणीसाठी आणि पेरलेले उगवण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मनातील दुःख कायम आहे.

सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण जून आणि जुलै  महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्या झाल्या नाही. ज्यांनी आज ना उद्या होईल या भरवशावर पेरणी केल्या, त्यांची पेरणी पावसाने दडी मारल्याने वाया गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेही संकट ओढावले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 40 टक्के इतकाच पाऊस आहे. मात्र, गेल्या 2 दिवसात 6 ते 7 मिनिटे इतकाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगल्या पावसाची आशा कायम असली, तरी त्यांची चिंता कायम आहे.

या सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे  जिल्ह्याची वरदायिनी असलेले  उजनी धरणं मात्र 73 टक्के भरलं आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात सोलापूर शहरासह उजनी धरणावर अवलंबून असलेल्या गावांची तहान भागणार आहे. मात्र, आजही जिल्यातील 150 हून अधिक गावांमध्ये 183 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 270 चारा छावण्यांमध्ये बळीराज्याचे पशुधन आश्रयाला आहे. त्यामुळे आमच्या शिवारात पुणे मुंबई सारखा पाऊस कधी पडणार असाच प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे.

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर