AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. (how did chirag paswan's ljp playe role in pushing nitish kumar's jdu)

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले 'जाएंट किलर'!
| Updated on: Nov 10, 2020 | 8:19 PM
Share

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. ऐनवेळी लोजपा नेते चिराग पासवान यांनी एनडीएतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवल्याने त्याचा फटका भाजपऐवजी नितीशकुमार यांनाच सर्वाधिक बसल्याचं दिसत आहे. पासवान यांच्या हाती यश आलं नसलं तरी त्यांनी जेडीयूची मते खेचून राज्यात नंबर वन होण्याचं नितीशकुमार यांचं स्वप्न त्यांनी भंग केलं असून पासवान हे खऱ्या अर्थाने बिहारमध्ये जाएंट किलर ठरले आहेत. (how did chirag paswan’s ljp playe role in pushing nitish kumar’s jdu)

हाती आलेल्या कलानुसार भाजपने 73 तर राजदने 64 जागांवर आघाडी घेातली आहे. तर जेडीयूने 49 जागांवर आघाडी घेतली आहे. चिराग पासवान यांच्या लोजपाला अवघ्या एका जागेवर आघाडी घेता आली आहे. मात्र, लोजपाला 5.8 टक्के मते मिळविण्यात यश आलं आहे. भाजपला आतापर्यंत 19.8 टक्के आणि जेडीयूला 15.4 टक्के मते मिळाली आहे. तर, आरजेडीला 22.9 टक्के मते मिळाली आहेत. जर लोजपाने जेडीयूच्या विरोधात उमदेवार दिले नसते तर जेडीयू बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला असता, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

चिराग पासवान यांनी जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले. त्यामुळे महादलित मतांची विभागणी झाली. त्याचा सर्वाधिक फटका जेडीयूला बसला आहे. मागच्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी महादलित हा नवा वर्ग केला होता. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला होता तर रामविलास पासवान यांना नुकसान झालं होतं. मात्र, पाच वर्षानंतर हे चित्रं उलटलं असल्याचं पाह्यला मिळत आहे. त्याशिवाय संपूर्ण निवडणुकीत चिराग यांनी आपण भाजपचे समर्थक असून निकालानंतर भाजपलाच पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेही चिराग यांचा लोजपा भाजपची बी टीम असल्याचा मेसेज गेला होता. त्याचाही परिणाम पाह्याला मिळाला आहे. जाणकारांच्या मते, लोजपाच्या 6 टक्के मतांपैकी 3 टक्के मतेही एनडीएला मिळाली असती तर नितीशकुमार यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असताच शिवाय एनडीएचा सरकार बनविण्याचा मार्गही सोपा झाला असता.

या आठ जागा गमावल्या

महुआ विधानसभा मतदारसंघात लोजपा उमेदवाराने 12 हजार मते घेतल्याने तिथे जेडीयूचा पराभव झाला. मटिहानी येथे लोजपाने 26 हजार मते घेतल्याने जेडीयूच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली आहे. महिषीमध्ये लोजपाने 7 हजार, जहानाबादमध्ये लोजपाने 20 हजार, कुर्था येथे 8 हजार, नोखा येथे 11 हजार आणि सासाराममध्ये 12 हजार मते घेऊन जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव केला. दिनारामध्ये मात्र जेडीयूच्या उमेदवाराने 21 हजार मते घेतल्याने लोजपा उमेदवाराचा पराभव झाला. इथे लोजपाला 46 हजार तर आरजेडीच्या उमेदवाराला 50 हजार मते मिळाले होते.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु

माजी मुख्यमंत्र्यांकडून माजी विधानसभा अध्यक्षांचा पराभव, जीतन राम मांझी 16 हजार 717 मतांनी विजयी

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

(how did chirag paswan’s ljp playe role in pushing nitish kumar’s jdu)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.