AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. (how did chirag paswan's ljp playe role in pushing nitish kumar's jdu)

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले 'जाएंट किलर'!
| Updated on: Nov 10, 2020 | 8:19 PM
Share

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. ऐनवेळी लोजपा नेते चिराग पासवान यांनी एनडीएतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवल्याने त्याचा फटका भाजपऐवजी नितीशकुमार यांनाच सर्वाधिक बसल्याचं दिसत आहे. पासवान यांच्या हाती यश आलं नसलं तरी त्यांनी जेडीयूची मते खेचून राज्यात नंबर वन होण्याचं नितीशकुमार यांचं स्वप्न त्यांनी भंग केलं असून पासवान हे खऱ्या अर्थाने बिहारमध्ये जाएंट किलर ठरले आहेत. (how did chirag paswan’s ljp playe role in pushing nitish kumar’s jdu)

हाती आलेल्या कलानुसार भाजपने 73 तर राजदने 64 जागांवर आघाडी घेातली आहे. तर जेडीयूने 49 जागांवर आघाडी घेतली आहे. चिराग पासवान यांच्या लोजपाला अवघ्या एका जागेवर आघाडी घेता आली आहे. मात्र, लोजपाला 5.8 टक्के मते मिळविण्यात यश आलं आहे. भाजपला आतापर्यंत 19.8 टक्के आणि जेडीयूला 15.4 टक्के मते मिळाली आहे. तर, आरजेडीला 22.9 टक्के मते मिळाली आहेत. जर लोजपाने जेडीयूच्या विरोधात उमदेवार दिले नसते तर जेडीयू बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला असता, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

चिराग पासवान यांनी जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले. त्यामुळे महादलित मतांची विभागणी झाली. त्याचा सर्वाधिक फटका जेडीयूला बसला आहे. मागच्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी महादलित हा नवा वर्ग केला होता. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला होता तर रामविलास पासवान यांना नुकसान झालं होतं. मात्र, पाच वर्षानंतर हे चित्रं उलटलं असल्याचं पाह्यला मिळत आहे. त्याशिवाय संपूर्ण निवडणुकीत चिराग यांनी आपण भाजपचे समर्थक असून निकालानंतर भाजपलाच पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेही चिराग यांचा लोजपा भाजपची बी टीम असल्याचा मेसेज गेला होता. त्याचाही परिणाम पाह्याला मिळाला आहे. जाणकारांच्या मते, लोजपाच्या 6 टक्के मतांपैकी 3 टक्के मतेही एनडीएला मिळाली असती तर नितीशकुमार यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असताच शिवाय एनडीएचा सरकार बनविण्याचा मार्गही सोपा झाला असता.

या आठ जागा गमावल्या

महुआ विधानसभा मतदारसंघात लोजपा उमेदवाराने 12 हजार मते घेतल्याने तिथे जेडीयूचा पराभव झाला. मटिहानी येथे लोजपाने 26 हजार मते घेतल्याने जेडीयूच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली आहे. महिषीमध्ये लोजपाने 7 हजार, जहानाबादमध्ये लोजपाने 20 हजार, कुर्था येथे 8 हजार, नोखा येथे 11 हजार आणि सासाराममध्ये 12 हजार मते घेऊन जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव केला. दिनारामध्ये मात्र जेडीयूच्या उमेदवाराने 21 हजार मते घेतल्याने लोजपा उमेदवाराचा पराभव झाला. इथे लोजपाला 46 हजार तर आरजेडीच्या उमेदवाराला 50 हजार मते मिळाले होते.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु

माजी मुख्यमंत्र्यांकडून माजी विधानसभा अध्यक्षांचा पराभव, जीतन राम मांझी 16 हजार 717 मतांनी विजयी

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

(how did chirag paswan’s ljp playe role in pushing nitish kumar’s jdu)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.