AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्वारंटाईन सेंटरला दिलेलं सामान परतलंच नाही; टीव्ही, 4 हजार गाद्या आणि 8 हजार बेड गायब

औरंगाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेले 1 कोटी रुपयांचे सामान गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ( Aurangabad quarantine centre equipment lost)

क्वारंटाईन सेंटरला दिलेलं सामान परतलंच नाही; टीव्ही, 4 हजार गाद्या आणि 8 हजार बेड गायब
| Updated on: Jan 12, 2021 | 4:04 PM
Share

औरंगाबाद : क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी ठेवलेले तब्बल 1 कोटी रुपयांचे  सामान गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्वारंटाईन सेंटरमधून टीव्ही, फ्रिज, रेडिओ अशा प्रकारचे सामान गायब झाले आहे. गायब झालेल्या सामानामध्ये फ्रिज, टीव्ही, संगणक, फॅनचा समावेश आहे. (in Aurangabad equipment worth of rupees 1 crore has been lost from quarantine centre)

संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना जागोजागी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले होते. औरंगाबादेतसुद्धा कोरोनाला थोपवण्यासाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या उपायोजना केल्या गेल्या. यावेळी शहरात जागोजागी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले. शाळा, कॉलेज, सार्वजनिक इमारती यांना खाली करुन तेथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले. यावेळी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून औरंगाबाद पालिकेने क्वारंटाईन सेंटर्सना टीव्ही, फ्रिज, रेडिओ, गाद्या, उशा असं सगळं काही पुरवलं होतं. आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्यासुद्धा कमी झालीये. त्यामुळे आता शहरातील बहुतांश क्वारंटाईन सेंटर्स रिकामे झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या काही वसतीगृहातसुद्धा कोरोना संशयितांना ठेवले होते. यातीलच एका वसतीगृहातील तब्बल 1 कोटी रुपयांचे सामान गायब झाले आहे. या वसतीगृहाला पुरवलेले टीव्ही, फ्रिज, रेडीओ, गाद्या, उशा, असं सगळं काही गायब आहे.

4 हजार गाद्या, 86 फॅन गायब

या वसतीगृहात एकूण 4 हजार गाद्या, 4 हजार किट, 8 हजार बेडशीट, 10 टीव्ही, 6 फ्रीज, 6 संगणक आणि 86 फॅन गायब झाले आहेत. हे साहित्य औरंगाबाद महापालिकेने पुरवले होते. मात्र ते महापालिकेच्या मुख्यालयात परत जमाच झालेलं नाही. या सामानाची किंमत तब्बल 1 कोटी असल्याचे सांगितलं जात आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यातही हे सामान महापालिकेचे असल्यामुळे प्रशासन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गायब झालेले सामान नेमके कुठे गेले?, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे फ्रिजपासून ते संगणकांपर्यंत सामानाचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

(in Aurangabad equipment worth of rupees 1 crore has been lost from quarantine centre)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...