AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात रेल्वेने पाणी; आता लातूरकडून सांगलीच्या उपकाराची परतफेड!

लातूर हा दुष्काळग्रस्त भाग आहे. येथे नेहमीच पाणी टंचाई असते. लातूरला दुष्काळात जेव्हा पाण्याची गरज होती, तेव्हा सांगलीतील मिरज येथून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला होता. सांगलीच्या त्या उपकाराची परतफेड आता लातूरकडून करण्यात येत आहे.

दुष्काळात रेल्वेने पाणी; आता लातूरकडून सांगलीच्या उपकाराची परतफेड!
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Aug 11, 2019 | 6:46 PM
Share

सांगली : यंदाचा पावसाळा कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील लोक कधीही विसरु शकणार नाहीत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महापुराने अक्षरश: थैमान घातलं. पंचगंगा, कोयना नदीचं कधी नव्हे ते रौद्ररुप या जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिलं. या महाप्रलयात लाखो लोकांची घरं, शेती, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावं ही पाण्याखाली गेली, अनेकांना त्यांचं घर सोडावं लागलं. या सर्वच पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक भागात आता पावसाने विश्रांती घेतली आहे, काही ठिकाणी पाणीही ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील हरिपुरात महापुराची स्थिती अद्यापही गंभीर आहे. सांगलीवर कोसळलेल्या या संकटात त्यांची मदत करण्यासाठी दुष्काळग्रस्त लातूरही पुढे सरसावलं आहे.

लातूर हा दुष्काळग्रस्त भाग आहे. येथे नेहमीच पाणी टंचाई असते. लातूरला दुष्काळात जेव्हा पाण्याची गरज होती, तेव्हा सांगलीतील मिरज येथून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला होता. सांगलीच्या त्या उपकाराची परतफेड आता लातूरकडून करण्यात येत आहे. सांगलीतील हरिपूर या पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं, त्यांच्यापर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तू पोहोचवण्याचं काम लातुरातील जवान करत आहेत. तर लातूर जिल्हा प्रशासनाचं आपत्ती व्यवस्थापनाची टीमही दिवस-रात्र युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.

सांगलीचा महापूर आता ओसरु लागला आहे. पाण्याची पातळी वाढताना फुटांनी वाढली, मात्र ओसरताना इंच-इंच पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागणार आहे. सांगली शहरातील महापुराचे पाणी ओसरु लागले असले, तरी हरिपुरात अद्यापही परिस्थिति गंभीरच आहे. हे गाव अजूनही पाण्याखाली आहे. या पुराच्या पाण्यात कित्येक जनावर मृत पावली आहेत. घरं, दुकानं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी अडकलेल्या लोकांपर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तू पोहोचवण्याचं काम लातुरातील जवान करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे पथक या ठिकाणी अविरत हे कार्य करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने लातूरने सांगलीच्या उपकारांची परतफेड केली आहे.

VIDEO : 

Follow Us
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार.
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही....
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही.....
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला...
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला....
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.