AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly: शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री येणार का? राऊत म्हणतात, मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून नियंत्रण !

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, आज तरी मुख्यमंत्री उपस्थित राहणार का, यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिलं.

Maharashtra Assembly: शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री येणार का? राऊत म्हणतात, मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून नियंत्रण !
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 10:31 AM
Share

मुंबईः महाराष्ट्र विधानसभा अधिनेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर आहेत. मात्र अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आहेत तिथूनच सभागृहावर नियंत्रण ठेवत आहेत.

‘मुख्यमंत्री तिथूनच नियंत्रण ठेवतायत’

आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री सभागृहात येणार का, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘अधिवेशन उत्तम पद्धतीने सुरू झालं आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत. सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे वेट अँड वॉच.. पहा काय होतंय ते.”

‘अतिअभ्यास करणाऱ्यांवर उपचार करायला राज्य सक्षम’

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया कशी घ्यायची यावरून सध्या वाद सुरु आहे. महाविकास आघाडी आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवडणूक घेणार आहे, मात्र राज्यपालांनी यावर आक्षेप घेतला आहे. याविषयीच्या प्रश्वावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे उत्तर पाठवलं ते तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये. घटनेतील तरतूदीनुसार काम करण्यासाठी राज्यपालांनी नियुक्ती होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारशी आणि लोकभावना या डावलून काम करण्यासाठी राज्यपालांनी नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू आहेत. विद्वान आहेत, पण त्या अभ्यासाचं आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये. सध्या राज्याच्या राजभवनात अभ्यासाचं अजीर्ण झालेलं आहे. अजीर्ण झालं की पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल तर राज्याचं आरोग्य खातं उपचार करायला सक्षम आहे.

इतर बातम्या-

विधानसभा अध्यक्षाची निवड आज होणार? अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक?

Aurangabad | निवडणुका टाळण्याचा प्रयत्न? मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रशासक नेमण्याचे आदेश

Follow Us
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं.
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं.