AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना मोठा आधार, निवृत्तीपर्यंत शासकीय निवास, 65 लाखांची मदत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला (Corona Police death family stay government house) आहे.

कोरोनामुळे शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना मोठा आधार, निवृत्तीपर्यंत शासकीय निवास, 65 लाखांची मदत
| Updated on: Jun 26, 2020 | 6:20 PM
Share

मुंबई : राज्यातील पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात राज्यातील काही पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना संबंधित पोलिसाच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येणार आहे. नुकतंच अनिल देशमुख यांनी याबाबतची घोषणा केली. (Maharashtra police death due Corona whose family stay in government house until retirement)

“संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या लढ्यात पोलीस दिवस रात्र लढत आहेत. यात जवळपास 51 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी गोष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या कुटुंबाला 65 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

त्यासोबतच ज्या शासकीय निवासस्थानात या पोलिसांचं कुटुंब राहतं, त्या कुटुंबांना त्याच शासकीय निवासस्थानात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत राहण्याचाही निर्णय घेण्यात आला,” असेही अनिल देशमुख यांनी सांगितले. याबाबतचा एक व्हिडीओ अनिल देशमुखांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

दरम्यान यापूर्वी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केली होतील. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल, असेही आयुक्तांनी सांगितले होते.

राज्यात 4 हजारहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण

दरम्यान सद्यस्थितीत राज्यात 4 हजार 271 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 450 अधिकारी तर 3 हजार 821 कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. ‬तर यातील 48 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 123 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता केवळ 1 हजार 100 पोलीस कोरोनाबाधित आहेत. ‬(Maharashtra police death due Corona whose family stay in government house until retirement)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Cabinet Decision : आशा सेविकांचं मानधन 3 हजारांवर, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे 12 निर्णय

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 4841 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 47 हजार 741 वर

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण