AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील आरटीओच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका, वाहनविषयक कामे रखडली

राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी सोमवारपासून संप पुकारला आहे. राज्यात सर्व आरटीओतील वाहनांसंबंधीचे काम ठप्प पडली आहेत.

राज्यातील आरटीओच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका, वाहनविषयक कामे रखडली
RTO
| Updated on: Sep 25, 2024 | 6:43 PM
Share

राज्यातील आरटीओंनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल 24 सप्टेंबरपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे.त्यामुळे राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांचे कामकाज ठप्प झालेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रशासकीय तरतूदींमुळे सेवाविषयी गुंतागूंत निर्माण झालेली आहे. मोटार वाहन विभागात पूर्वीपासून 15 प्रादेशिक परिवहन कार्यालयानुसार नियतकालिक बदल्या केल्या जात होत्या. परंतु राज्य शासनाने हे धोरण बदलून महसूल विभागीय बदल्यांचे धोरण सुरु केले आहे.हे धोरण कर्मचारीवर्गाच्या दृष्टीकोनातून अन्यायकारक आहे अशी संघटनेची धारणा आहे. मोटार वाहन विभाग (RTO) कर्मचारी संघटना (शासन मान्यताप्राप्त) राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे गेली 66 वर्ष यशस्वीपणे प्रतिनिधीत्व करीत आहे.या संघटनेने हे बेमुदत आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या संपामुळे सर्वसामान्य वाहन चालकांसोबतच अवजड वाहतूक संपूर्ण ठप्प झालेली आहे.

राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने राज्यभरातील ट्रक चालक आणि मालक यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. वाहनासंबंधीचे वाहन मालकी हस्तांतरण, फिटनेस प्रमाणपत्र नुतनीकरण, पत्त्यात बदल करणे, एनओसी जारी करणे, हायपोथेकशनची कामे रखडली असल्याचे राज्यातीस संपूर्ण मालवाहतूक या आरटीओ संपामुळे बाधित झालेली आहे. या संपावर लवकर तोडगा न निघाल्यास अवजड वाहतूक व्यवसायिकांची आणखी अडचण होणार असल्याचे वाहतूकदाराच्या कोअर कमेटीचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कांग्रेसचे ( AIMTC ) माजी अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी सांगितले.

आरटीओ कर्मचारी हवालदिल

गेल्या दोन वर्षात विविध अन्यायकारक प्रशासकीय तरतुदीमुळे अनेक सेवाविषयक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोटार वाहन विभागात आधी 15 प्रादेशिक परिवहन कार्यालयाप्रमाणे नियतकालिक बदल्या होत होत्या.परंतु प्रशासनाने हे धोरण बदलून महसूल विभागीय बदल्यांचे धोरण सुरु केले आहे. हे धोरण कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने अन्यायकारक आहे, त्यामुळे महसूली विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करावे अशी आरटीओ संघटनेची आग्रही मागणी आहे. विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात अनाकलनीय बदल केले आहेत. त्यामुळे राज्यातील आरटीओ कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आकृतीबंधाची सुयोग्य अंमलबजावणी न करणे, कामकाजात सुसुत्रीकरण येण्यासाठी नेमण्यात आलेल्या मा. कळसकर समितीच्या कार्यपध्दतीची अंमलबजावणी न करणे, विभागीय स्तरावरील आस्थापना विषयक,सेवा ज्येष्ठता आणि बदल्यांचे संयोजन याबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही न झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचा-यांनी संतप्त होऊन 24 सप्टेंबरपासून बेमुदत सुरु केला असल्याचे संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले आहे.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.