AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सअॅप फोटोवरुन प्रवाशाने बॅग ओळखली, सहा लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद

धावत्या रेल्वेत आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान चोरणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे

व्हॉट्सअॅप फोटोवरुन प्रवाशाने बॅग ओळखली, सहा लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद
| Updated on: Feb 05, 2020 | 1:49 PM
Share

मनमाड : पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवल्यानंतर प्रवाशाने आपली चोरीला गेलेली बॅग ओळखली आणि अवघ्या काही तासांत सहा लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद झाली. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या चोरीचा थरारक पर्दाफाश (Manmad Bag Ornaments Theft)  झाला.

विदर्भ एक्स्प्रेसमधून रोख रकमेसह तब्बल सहा लाखांचे दागिने असलेली बॅग लंपास करणाऱ्या टोळीला मनमाड रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने जेरबंद केलं. तिघा आरोपींची धरपकड करण्यात पोलिसांना यश आलं, तर दोन आरोपी फरार आहेत. अटकेतील आरोपींमध्ये चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाचाही समावेश आहे.

आरोपीकडून विदर्भ एक्स्प्रेसमधून चोरण्यात आलेली बॅग जप्त करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

धावत्या रेल्वेत आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान चोरणारी सराईत गुन्हेगारांची ही टोळी असून त्यांनी कुठे-कुठे आणखी किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास केला जात असल्याचं रेल्वे पोलिस निरीक्षक एन. के. मदने यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील बोरिवलीत राहणारे संजय श्रीपाद हातवळणे आपल्या कुटुंबीयांसोबत वर्ध्याहून विदर्भ एक्स्प्रेसच्या एस-6 या आरक्षित डब्यातून मुंबईला जात होते. त्यांनी आपल्या सर्व बॅगा सीटखाली ठेवल्या होत्या. त्यातील एका बॅगेत रोख रकमेसह सहा लाख आठ हजार रुपये किमतीचे दागिने होते.

गाडी मनमाडला आल्यानंतर हातवळणे यांच्या मुलीला जाग आली. तिने सामानाची तपासणी केली असता, दागिने असलेली बॅग तिला दिसली नाही. त्यामुळे तिने लगेच हा प्रकार वडिलांच्या कानावर घातला. मात्र तोपर्यंत गाडीने रेल्वे स्टेशन सोडलं होतं.

संजय हातवळणे यांनी मनमाड रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क करुन घडलेली घटना सांगितली. ‘तुम्ही पुढच्या पोलिस स्थानकात तक्रार दाखल करा. आम्ही इकडे तपास सुरु करतो’ असं पोलिस निरीक्षक मदने यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर हातवळणेंनी आरपीएफ ठाणे गाठलं आणि आरपीएफ इन्स्पेक्टर के. डी. लकडा यांना घटनेची माहिती दिली.

दोघांनी कंट्रोल रुममध्ये जाऊन सीसीटीव्ही तपासले असता एक संशयित व्यक्ती बॅग घेऊन जाताना त्यांना दिसली. त्याच्या बॅगेचा फोटो पोलिसांनी संजय हातवळणेंना व्हॉट्सअॅपवर पाठवला. तेव्हा ही आपलीच बॅग असल्याचं त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी दोन पथकं करुन सापळा रचला आणि अवघ्या काही तासात त्यांना आरोपींना शोधण्यात यश आलं. या प्रकरणी पोलिस आणि आरपीएफ यांनी संयुक्त कारवाई करत संजय सुखदेव कापसे (रा. तामसवाडी, निफाड), संदीप बबन वानखेडे (रा. नागरदास, वाशिम) यांच्यासोबत एका सराफाला ताब्यात घेतलं.

त्यांच्याकडून चोरलेली बॅग आणि त्यातील मुद्देमाल जप्त केला. त्यांचे आणखी दोन साथीदार फरार झाले आहेत. रेल्वे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि 397/34, 411 आणि भारतीय रेल्वे कायद्याच्या 137, 147 अन्वये गुन्हा दाखल (Manmad Bag Ornaments Theft) केला आहे.

Follow Us
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.