AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीसांशी मी बोलत नाही, पण शेतकऱ्यांसाठी फोन करणार’, मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना या परिस्थतीत सरकारकडून मदतीची आस आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील याबाबत राज्य सरकारचे कान टोचले आहेत. तसेच राज्य सरकारही प्रशासकीय पातळीवर काम करत आहे. पण नुकसानग्रस्त भागांची लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत […]

'देवेंद्र फडणवीसांशी मी बोलत नाही, पण शेतकऱ्यांसाठी फोन करणार', मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील
| Updated on: Sep 04, 2024 | 10:05 PM
Share

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना या परिस्थतीत सरकारकडून मदतीची आस आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील याबाबत राज्य सरकारचे कान टोचले आहेत. तसेच राज्य सरकारही प्रशासकीय पातळीवर काम करत आहे. पण नुकसानग्रस्त भागांची लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. या दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. राज्य सरकारने तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करु, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांची पाहणी केली. यानंतर त्यांनी भूमिका मांडली. “देवेंद्र फडणवीसांशी मी बोलत नाही. पण शेतकऱ्यांसाठी फोन करणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला नाही तर शेतकऱ्यांना घेवून रस्त्यावर उतरणार”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. “शेतकऱ्यांना तातडीने मदत करा आणि कर्जमाफी द्या”, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

‘मी सगळ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतोय’

“शेतकऱ्यांसाठी मी सगळ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतोय. निसर्गात आमचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावतोय. फडणवीसांना आताच फोन करणार आहोत. उद्याच्या कॅबिनेटमध्ये नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जास्तीची तरतुद करा. आमचेही दोन माणसं फोन लावत आहेत. विदर्भातील प्रश्न मी सांगणार आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“शेतकऱ्याला कधीही जात नसते. व्याजानं आणून त्यांनी घेतलेले आहेत. लेकराच्या बरोबरीनं त्यांनी पीक जपलं आहे. कधीही संकट आलं तरी खचून जावू नका. तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका. मी काही राजकारणी माणूस नाही. मला नाटकबाजी जमत नाही. काल मी पुणे जिल्ह्यात होतो. शेतकऱ्यांचे आम्ही पोरं आहोत. एकानेही खचून जावून टोकाचं पाऊल उचलू नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांना केलं.

“जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलणार आहे. दिवसरात्र काम केल्यानंतर अशी घटना घडली. शेतकऱ्यांच्या वेदना कळतात. आम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहोत, आम्ही पूर्ण माहिती घेवून काम करतोय. आपण स्वत: अर्ज तयार करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे नेवून द्या. तुमची आम्हाला खूप गरज आहे. खूप कुटुंब उघडे पडलेल आहेत”, अशी भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.