AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसई-विरार महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायलयाची स्थगिती

वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायलयाने स्थगिती दिली आहे.(Mumbai High Court  stay on Vasai Virar Municipal election process)

वसई-विरार महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायलयाची स्थगिती
| Updated on: Oct 28, 2020 | 11:03 AM
Share

वसई-विरार : वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायलयाने स्थगिती दिली आहे. प्रभाग रचनेच्या प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र सादर करेपर्यंत ही स्थगिती देण्यात आली आहे. प्रभाग रचनेच्या घेतलेल्या हरकतीवर योग्य ती दाद न मिळाल्याने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतची पुढील सुनावणी 29 ऑक्टोबरला होणार आहे. (Mumbai High Court  stay on Vasai Virar Municipal election process)

काँग्रेसचे वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस आणि पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वसई विरार शहर महापालिकेत एकूण 115 वॉर्ड आहेत. अनेक प्रभागात मतदार संख्येत तफावत आढळल्या आहेत. वॉर्ड रचना करताना 2010 आणि 2015 चा निकष पकडला आहे. पण 2010 ची वॉर्ड रचना 2001 मधील जनगणनेच्या आधारे केली होती तर 2015 वॉर्ड रचना 2011 जनगणना आधारे करण्यात आली होती. तेच निकष 2020 च्या ही प्रभाग रचनेसाठी लावले आहेत, असा आक्षेप घेऊन भौगोलिक रचना लक्षात घेतली नसल्याचे याचिका कर्त्याचे म्हणणे होते.

या प्रकरणी 25 फेब्रुवारी 2020 रोजी वसई विरार महानगरपालिकेने निवडणुकाबाबत अधिसूचना जारी केली. तसेच 2 मार्चला आरक्षणाची सोडत घेतली होती. त्यावेळी आरक्षण, वॉर्ड रचना, भौगोलिक रचना याबाबत वर्तक यांनी लेखी हरकती घेतल्या होत्या.

या हरकतीवर 11 सप्टेंबरला विरार येथे निवडणूक निरीक्षक संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली होती. मात्र एक हरकत मान्य करून अन्य सर्व हरकती फेटाळून लावल्याचे महानगरपालिका आयुक्त यांनी कळविले होते.

दरम्यान याप्रकरणी दाद मिळत नसल्याने अखेर समीर वर्तक यांनी मुंबई उच्च न्यायालयात महानगरपालिका निवडणुकाबाबत याचिका दाखल केली. याची पहिली सुनावणी 15 ऑक्टोबरला झाली.

यावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत 20 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होतेय. तर 22 ऑक्टोबरला सुनावणीच्या वेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात याचिकेची प्रत मिळाली नसल्याचे सांगितले.

त्यानंतर 27 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी असा निर्णय सुनावला आहे.

वॉर्ड रचना, आरक्षण, भौगोलिक रचना संबधी हरकती मांडल्या. मात्र दाद मिळाली नाही म्हणून न्यायालयाचे दार ठोठावल्यानतंर त्याबाबत न्यायालयाने चांगला निर्णय घेतला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी दिली. (Mumbai High Court  stay on Vasai Virar Municipal election process)

संबंधित बातम्या : 

तब्बल 219 दिवसांनंतर ‘आपली बस’ प्रवाशांच्या सेवेत; नागपूरकरांना दिलासा

नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ. संजय दुधे यांची नियुक्ती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.