AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला राजकोटमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

समित ठक्करविरोधात नागपूरच्या सीताबर्डी आणि मुंबईच्या विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये आयटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला राजकोटमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई
| Updated on: Oct 26, 2020 | 2:58 PM
Share

नागपूर : ट्विटरवर राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणाऱ्या समित ठक्कर (Nagpur Police Cyber Crime) नामक तरुणाला नागपूर पोलिसांनी राजकोट मधून अटक केली. समित ठक्करविरोधात नागपूरच्या सीताबर्डी आणि मुंबईच्या विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये आयटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे (Nagpur Police Cyber Crime).

नागपूर पोलिसांनी काल (25 ऑक्टोबर) राजकोटमध्ये ठक्करला अटक केली आणि ट्रांजिट रिमांडवर त्याला नागपूरला आणले आहे. समित ठक्कर हा तरुण मूळचा नागपूरचा रहिवाशी असला तरी तो आता मुंबई येथे वास्तव्यास आहे. गेल्या काळात त्याने सत्तात्याने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट या समाज माध्यमांवर केलेल्या आहेत.

या विरोधात नागपुरातील शिवसैनिकांनी ऑगस्ट महिन्यात नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यात तक्रारीं दाखल केल्यानंतर नंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात समित ठक्करविरोधात आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. समितला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 5 ऑक्टोबरला तो मुंबईच्या वी.पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर आला. मात्र, त्यानंतर तो तिथून निघून गेला होता.

त्यानंतर मात्र त्याच्यावर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आता नागपूर पोलिसांनी त्याला राजकोट येथून अटक केली. पुढील तपासाकरिता त्याला मुंबई पोलिसांकडे देखील सोपवले जाऊ शकतं.

Nagpur Police Cyber Crime

संबंधित बातम्या :

पुण्यात पावणे अकरा लाखांचे मेफेड्रॉन ड्रग जप्त, कात्रजमध्ये धाडसी कारवाई

काकीने फसवून ड्रग्जचे पाकीट पाठवले, कतारमध्ये दहा वर्षांची शिक्षा झालेल्या मुंबईकर दाम्पत्याची केस NCB च्या हाती

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.