AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात एकवटलो, आता केंद्राचं सरकारही उलथून पाडू, नाना पटोलेंचं आवाहन

केंद्राच्या सरकारला उलथून पाडण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात  एकवटलो, आता केंद्राचं सरकारही उलथून पाडू, नाना पटोलेंचं आवाहन
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 17, 2022 | 2:28 PM
Share

मुंबईः महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात आज जनता एकवटली आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलक महामोर्चात सहभागी झाले आहेत. या एकजुटीनं महाराष्ट्रातील सरकारच नाही तर त्यांना अभय देणारं केंद्रातलं सरकारच उलथून टाकू, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. मुंबईत महाविकास आघाडी आयोजित महामोर्चा हल्लाबोल आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला. मुख्य मंचावर भाषण करताना नाना पटोले यांनी भाजपवर सणकून टीका केली.

नाना पटोले म्हणाले, ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाराष्ट्र एकत्रित झाला आहे. आज तिरंग्यात सगळा महाराष्ट्र एकत्रित आला. लाखोंच्या मोर्चात पहायला मिळतंय. राज्यपाल भवनातून आपल्या महाराष्ट्राच्या दैवताला अपमान करण्याचं काम राज्यपालांनी सुरुवात केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कळस घातला. कर्मवीर भाऊराव पाटील, आंबेडकर, महात्मा फुले, या सगल्यांच्या अवमानाची मालिका भाजपाने सातत्याने केली गेली….

महाविकास आघाडीचे सगळे खासदार गृहमंत्र्यांना भेटले. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान केला. त्यावरून निवेदन करून कारवाई करण्याची विनंती केली. पण कारवाई झाली नाही. नागपुरात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यपाल बसलेले दिसून आले. म्हणजेच भाजपाचा खरा चेहरा अशा रितीने पुढे आला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचदा माफी मागितली, असं बोलून कळस गाठला. या विरोधात जनतेच्या मनात मोठा आक्रोश आहे. सीमावादाचाही प्रश्न आहे. कधी नव्हे तर राज्यातील अनेक गावं, गुजरात, तेलंगणा, आंध्रात जाण्याची वातावरण निर्मिती आहे. मुंबईदेखील केंद्रशासित करण्याचा त्यांचा प्लॅन आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

महाराष्ट्राची अस्मिता कायम रहावी, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यातील जनतेनं लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावली. भाजपने तर आंदोलन करत आहे. चोराच्या उलट्या बोंबा, यानिमित्ताने हे चित्र सिद्ध झालं. केंद्राच्या सरकारला उलथून पाडण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.