AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोरगरीबांचा अन्नासाठी संघर्ष, केंद्राने ‘या’ निर्णयाचा पुनर्विचार करावा, सुप्रिया सुळे यांची विनंती

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याच्या केंद्र सरकार निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे (Supriya Sule requests to rethink on using rice to make sanitizer)

गोरगरीबांचा अन्नासाठी संघर्ष, केंद्राने 'या' निर्णयाचा पुनर्विचार करावा, सुप्रिया सुळे यांची विनंती
| Updated on: Apr 21, 2020 | 4:09 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. देशातील गोरगरीब अन्नासाठी संघर्ष करत असल्याने केंद्राने निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती सुळे यांनी केली आहे. (Supriya Sule requests to rethink on using rice to make sanitizer)

केंद्र सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅनिटायजर आवश्यक आहे, त्याचे उत्पादन करायलाच हवे. परंतु कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील गोरगरीब एकीकडे अन्नासाठी संघर्ष करत आहेत, याकडे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.

या काळात आपले सर्वांचे प्राधान्य गरीबांचे पोट भरण्यास असायला हवे. आपण हा तांदूळ स्थलांतरीत मजूरांसाठी देऊ शकतो. आपणास विनंती आहे की, या निर्णयाचा कृपया पुनर्विचार करुन तो तांदूळ गरीबांना वाटण्यासाठी उपलब्ध करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या ट्वीटमध्ये सुळे यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग केले आहे.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात वारंवार साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सॅनिटायजर सर्वांना उपलब्ध व्हावं म्हणून त्याचं उत्पादन वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्राने तांदळापासून सॅनिटायजर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. (Supriya Sule requests to rethink on using rice to make sanitizer)

हेही वाचा : पालघरप्रकरणी राजकारण नको, सर्व आरोपी अटकेत : शरद पवार

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.