AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वेळीच उपचार मिळाला असता तर वाचला असता जीव’, दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत का गेले हकनाक जीव, या व्यक्तीने सांगीतला घटनाक्रम

New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री अचानक चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यात जवळपास 18 लोकांचा मृत्यू झाला. गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला. काय आहे घटनेचं नेमकं कारण? चेंगराचेंगरीत यामुळे गेले हकनाक जीव...

'वेळीच उपचार मिळाला असता तर वाचला असता जीव', दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत का गेले हकनाक जीव, या व्यक्तीने सांगीतला घटनाक्रम
| Updated on: Feb 16, 2025 | 9:35 AM
Share

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री अचानक गर्दी उसळली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. काही जणांना एलएनजेपी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. या चेंगराचेंगरीत बिहारमधील सोनपूर येथे राहणारे पप्पू कुमार यांच्या सासूचा मृत्यू झाला. वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. या चेंगराचेंगरीचा संपूर्ण घटनाक्रम पप्पू कुमार यांनी सांगीतला. त्यातून या घटनेत हकनाक कसे बळी गेले हे समोर आले आहे.

सासू घरी पोहचलीच नाही

या घटनाक्रमाची माहिती पप्पू कुमार यांनी दिली. त्यानुसार ते सासूला तिच्या गावी सोडवायला जात होते. ती जवळपास 50 वर्षांची होती. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता ते रेल्वेने गावी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आले होते. त्यांना बिहारमधील दानापूर येथे जायचे होते. दानापूर येथून सोनपूर येथे जायचे होते. सोनपूर हे पप्पू कुमार यांचे गाव आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वर ते रेल्वेची वाट पाहत होते. जवळपास 9 वाजता चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक लोक दबले. त्यात त्यांची सासू पण होती.

वेळीच उपचार नाही मिळाले

पप्पू कुमार यांनी या घटनेत लोकांचा जीव का गेला, याविषयी एक दावा केला आहे. त्यांच्या मते, अचानक रेल्वे स्टेशनवर गर्दी उसळली. त्यापूर्वी या रेल्वे स्टेशन काहीच गर्दी नव्हती. अचानक गर्दी आली. ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी पोलीस आणि प्रशासनमधील कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर वेळेवर ॲम्बुलन्स न मिळाल्याने वृद्ध लोकांना रुग्णालयात उपचारासाठी नेता आले नाही. त्यामुळे अनेकांचा जीव गेला. त्यांच्या सासूला सुद्धा वेळेत रुग्णालयात उपचारासाठी नेता आले नाही. त्यामुळे तिचा जीव गेला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोक

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. ज्यांनी या घटनेत जवळील नातेवाईकांना गमावले. त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे ते म्हणाले. तर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली. या चेंगराचेंगरीचा ज्यांना फटका बसला आहे, त्यांना

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.