AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : थरार ! पावसामुळे लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी विद्युत वाहिनीवर, वैतरणा नदीचा अचानक प्रवाह वाढला, आणि…

वैतरणा नदीच्या पात्रात विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी (लाईटमन) गेले होते. मात्र, अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे कर्मचारी तिथेच अडकून पडले.

VIDEO : थरार ! पावसामुळे लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी विद्युत वाहिनीवर, वैतरणा नदीचा अचानक प्रवाह वाढला, आणि...
थरार ! मुसळधार पाऊस, लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी वैतरणा नदीत, पाण्याचा प्रवाह वाढला आणि.....
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 6:12 PM
Share

हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्याचबरोबर पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पालघरमध्ये देखील तशीच घटना घडली होती. विशेष म्हणजे वैतरणा नदीच्या पात्रात विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी (लाईटमन) गेले होते. मात्र, अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे कर्मचारी तिथेच अडकून पडले होते. त्यांना नदीच्या काठावर येणं कठीण होऊण बसलं होतं. ते वैतरणा नदीपात्रातील विद्युत वाहिनीवर अडकले. पण अखेर दीड तासांनी एनडीआरएफच्या पथकाने त्यांना सुखरुप नदी पात्रातून बाहेर काढलं.

नेमकं काय घडलं?

पालघर जिल्ह्यात काल (24 जुलै) पावसामुळे विजेची एक लाईन तुटली होती. त्यामुळे तिच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन लाईनमन नदी पात्रात गेले. ते वैतरणा नदीवरील उच्च दाब विद्युत वाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी गेले. यावेळी ते नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने विद्यूत वाहिनीवरच अडकले. अखेर संध्याकाळी त्यांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं.

…आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढला

मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ असं या दोन महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बंद असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नदीत पूर असल्याने हे दोन्ही कर्मचारी विद्युत वाहिनीवरून नदी पार करणार होते. नदीतून आपल्यासोबत कंडक्टर घेऊन जात असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना कंडक्टर पुढे घेऊन जाण्यास अशक्य होत होते. त्यामुळे त्यांना पुढे जाणे शक्य होत नव्हते.

एनडीआरएफच्या पथकाकडून कर्मचाऱ्यांची सुटका

वैतरणा नदीच दोन्ही काठाचे अंतर जास्त असल्याने हे दोन्ही कर्मचारी मध्यभागीच अडकले. नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पालघरमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या टीमला मदतीसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर या टीमच्या मदतीने दोन्ही कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.

या घटनेचा थरार बघा :

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.