AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत.(PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा
| Updated on: Sep 27, 2020 | 9:22 AM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आज (27 सप्टेंबर) मन की बात (Mann ki Baat) या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविषयी बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरातील शेतकरी कृषी विधेयकाचा विरोध करत आहेत. त्यामुळे मोदी कृषी विधेयकावरुन देशवासियांना संबोधन करु शकतात. (PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

आज सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित होतो. आज प्रसारित होणार कार्यक्रम हा 69 वा असणार आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी त्यांच्या ट्विटरवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोना काळात मोदींनी सतत जनतेशी संवाद साधला आहे. आज ते नेमकं कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विधेयक, शेती आणि शेतकरी या विषयांवर बोलण्याची शक्यता आहे. यासोबतच कोरोना महामारी आणि भारत-चीन सीमावादावरही मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे.

गेल्या मन की बात या कार्यक्रमातून आत्मनिर्भर भारत यावर चर्चा केली होती. आता सर्वांना लोकल टू व्होकल व्हावं लागणार आहे. भारतीय बाजारपेठा या चीनी खेळण्याच्या वस्तूंनी व्यापल्या आहेत. त्यामुळे देशवासियांना मिळून काही नवीन खेळाचे प्रकार बनवले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.

कृषी विधेयकाला विरोध का?

कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचं सांगून रद्द करण्याची मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची आहे. दुसरीकडे भाजपने कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्याच बाजूनं असल्याचा दावा केलाय. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना देशात कोणत्याही राज्यात शेतमाल विकता येणार आहे. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या चक्रातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदीदारासोबत 5 वर्षांसाठी शेतमालाचा करार करता येणार आहे. शेतकरी बंधनमुक्त होईल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल. पण यामुळे शेतीमालाला MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळणार नसल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. (PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

संबंधित बातम्या : 

कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.