AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Wedding | पुण्यात हॉटेलमध्ये 250 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न, 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू, हॉटेलला नोटीस

लॉकडाऊनच्या सर्व नियमांची पायमल्ली करत तब्बल 250 वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.

Pune Wedding | पुण्यात हॉटेलमध्ये 250 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न, 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू, हॉटेलला नोटीस
| Updated on: Aug 11, 2020 | 6:37 PM
Share

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबत नाही (Pune Wedding Ceremony). तरी, पुणेकर अद्यापही बेफिकीर सारखे वागताना दिसत आहेत. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक लग्न सोहळा पार पडला. फक्त 50 जणांची परवानगी असतानाही लॉकडाऊनच्या सर्व नियमांची पायमल्ली करत तब्बल 250 वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Wedding Ceremony).

धक्कादायक बाब म्हणजे, या लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्यांपैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा कोरोनानमुळे मृत्यू झाला आहे. 30 जूनला हा लग्न सोहळा पार पडला.

लॉकडाऊन काळात हॉटेलमध्ये लग्न सोहळा करणे या हॉटेलला चांगलच महागात पडलं आहे. लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या पंचतारांकित हॉटेलला नोटीस पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Wedding Ceremony).

पुण्यातील नगररोडवरील हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या लग्नात तब्बल 250 वऱ्हाडी उपस्थित होते. लग्न सोहळ्याला उपस्थित 25 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर उपस्थितांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर कपिल राजेश गर्ग, विशाल उमेशचंद्र तिवारी यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

Pune Wedding Ceremony

संबंधित बातम्या :

लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा

पुण्यात अनोखं लग्न, मुलाचे वडील देहरादूनमध्ये, मुलीचे वडील नागपुरात, पोलिसांकडून कन्यादान

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.