AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवींद्र जाडेजाची चपळाई टीम इंडियाच्याच अंगाशी, 13 वेळा साथीदार रनआऊट

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) सिडनी कसोटीमध्ये 8 जानेवारीला क्षेत्ररक्षण करताना कमाल केली होती. त्याने अप्रतिम थ्रोवर स्टिव्ह स्मिथला धावबाद करुन भारताला मोठी विकेट मिळवून दिली होती.

रवींद्र जाडेजाची चपळाई टीम इंडियाच्याच अंगाशी, 13 वेळा साथीदार रनआऊट
| Updated on: Jan 10, 2021 | 8:55 AM
Share

सिडनी : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) सिडनी कसोटीमध्ये 8 जानेवारीला क्षेत्ररक्षण करताना कमाल केली होती. त्याने अप्रतिम थ्रोवर स्टिव्ह स्मिथला धावबाद करुन भारताला मोठी विकेट मिळवून दिली होती. परंतु 9 जानेवारीला जेव्हा जाडेजा फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्यामुळे भारताचे दोन फलंदाज धावबाद झाले. जाडेजासोबत भागिदारी करण्यासाठी मैदानात आलेल्या रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह हे दोघेजण धावबाद झाले. (Ravindra Jadeja involves in 20 run outs in his test careet)

जाडेजाने अश्विनसोबत एक धाव चोरण्याच्या प्रयत्न केला होता, परंतु ते खूपच अवघड होते. पॅट कमिंसच्या लक्षात आलं होतं की, अश्विन जाडेजाच्या तुलनेत थोडा हळू धावतो. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियन विकेटकीपरकडे थ्रो करुन अश्विनला धावबाद (रनआऊट) केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह मैदानात आला. जाडेजाने एक चेंडू स्क्वेयर लेगच्या दिशेने मारला आणि बुमराहला एक धाव घेण्याचा इशारा केला. परंतु यावेळी मार्नस लाबूशेनने बुमराहला धावबाद केलं. असं पहिल्यांदाच झालेलं नाही. जाडेजाने यापूर्वीदेखील अनेक साथीदारांना अशाच पद्धतीने धावबाद केलं आहे. मेलबर्न कसोटीत त्याने कर्णधार रहाणेला असंच धावबाद केलं होतं.

73 डावांमध्ये 20 जण रनआऊट

रवींद्र जाडेजा त्याच्या 73 कसोटी डावांमध्ये एकूण 20 वेळा रनआऊटमध्ये सहभागी झाला आहे. 13 वेळा त्याने त्याच्या जोडीदाराला आऊट केलं आहे. तर इतर 7 वेळा तो स्वतः रनआऊट झाला आहे. याची सरासरी काढायची झाल्यास 3.5 प्रतिडाव असं उत्तर येईल. यायाच अर्ध 3-4 डावांमध्ये जाडेजामुळे एकदा तरी त्याचा साथीदार रनआऊट होतो अथवा तो स्वतः तरी रनआऊट होतो. याचं प्रमुख कारण जाडेजा खूप जलद धावतो, परंतु त्याच्यासोबत असलेला त्याचा साथीदार त्याच्याइतका जलद धावू शकत नाही.

दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा मालिकेबाहेर

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेबाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. सिडनी कसोटीत फलंदाजी करताना रवींद्र जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं निदान झालं आहे. यामुळे जाडेजाची चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची चिन्ह आहेत. दरम्यान याबाबत बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

PTI दिलेल्या वृत्तानुसार, दुखापतीनंतर जाडेजाच्या बोटाचं स्कॅन करण्यात आलं. यामध्ये अंगठ्याचं हाड सरकरल्याचं निदान झालं आहे. तसेच फ्रॅक्चरही झालं आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या सू्त्रांनुसार सांगितले की, जाडेजाला या दुखापतीमुळे हातात ग्लोवज घालून फलंदाजी करण्यास त्रास होत आहे.” यामुळे जाडेजाचं चौथ्या कसोटीला मुकण्याची तीव्र शक्यता आहे. या दुखापतीमुळे जाडेजाला किमान 3-4 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागू शकते.

हेही वाचा 

 सिडनीत रडीचा डाव, दारु पिऊन बुमराह, सिराजला शिव्या, भारताकडून तक्रार

‘दस का दम’, डेव्हिड वॉर्नरला बाद करत अश्विनची विक्रमी कामगिरी

(Ravindra Jadeja involves in 20 run outs in his test careet)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.