AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचे शत्रू आता यांना तारणहार वाटू लागलेत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Sanjay Raut on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक राज्यात होत आहे. दिवाळीचा सण साजरा होत आहे. दिवाळी निमित्त संजय राऊतांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

महाराष्ट्राचे शत्रू आता यांना तारणहार वाटू लागलेत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरे, संजय राऊतImage Credit source: ANI
| Updated on: Oct 31, 2024 | 12:05 PM
Share

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे शत्रू आता यांना तारणहार वाटू लागलेत, असं संजय राऊत म्हणालेत. एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. या वर्षी मनसेच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आता संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

याआधीही अनेकवेळा मनसे पक्षाने 25 वर्षे आमचं सरकार येईल, असं सांगण्यात आलं. अनेकवेळा त्यांचा आमदार विधानसभेत निवडून आला नाही. आता एखाददुसरा आमदार निवडून येण्यासाठी ते देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी करत आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूशी हातमिळवणी करत आहेत. भविष्यात राजकारणात चर्चा होईल. मनसेच्या मदतीनं सरकार येणार असेल. 150 जागा मनसेला मिळतील आणि फडणवीसांना 50 जागा मिळतील. महाराष्ट्रात भाजपला 50 जागा ही मिळणार नाहीत. गेल्या 2 महिन्यात असे काय झाले राज ठाकरे भाजपसोबत गेले. हा दबाव नेमका कुणाचा ईडीचा आहे की सीबीआयचा? ईडीचा दबाव आहे का?, असं संजय राऊत म्हणालेत.

येऊ द्या त्याचं सरकार… प्रत्येक बाप मुलाविषयी धडपड करत असतो. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असतो. मुलगा ही आमचा, आमच्या परिवारातला आहे. राज ठाकरे म्हणत होते अमित शाह, मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. आता असं काय झालं? मोदी-शाह- फडणवीसांचं राजकारण महाराष्ट्रद्रोही आहे. राज ठाकरे मोदी शाहांना महाराष्ट्राचा शत्रू म्हणत होते. ते महाराष्ट्राच्या शत्रुंशी हातमिळवणी करत आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

तीन महिन्यांआधी वाटत होती की महाविकास आघाडीचं वगैरे सरकार येईल. पण आता वाटतं की सरकार हे महायुतीचंच होईल. ते इतकं सोपं नाहीये. आता आमच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री होईल. पुढच्यावेळी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. त्यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.