AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्धीकी प्रकरणात राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्यं, माझ्या हातात सरकार द्या..48 तासांत

बाबा सिद्धीकी यांची हत्या झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर सरकारचे लोक सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहणार ? यावर आता राज ठाकरे यांनीही वक्तव्यं केले आहे.

बाबा सिद्धीकी प्रकरणात राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्यं, माझ्या हातात सरकार द्या..48 तासांत
| Updated on: Oct 30, 2024 | 5:50 PM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकाचे पडघम वाजत आहेत. माजी मंत्री आणि एनसीपीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. यावर आता विधानसभेत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर देखील भाष्य केले आहे.त्यांनी बाबा सिद्धीकी यांच्या नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणातही मोठे भाष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी एका खाजगी चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना बाबा सिद्धीकी यांच्या हत्ये संदर्भात प्रश्न विचारण्यात आला, त्याला उत्तर देताना ते म्हणाले की मुंबईतील बॉलीवूडमध्ये पूर्वी व्हायचे ते आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होत आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. त्यांना 48 तास देण्यात यावे, मुंबईला साफ करायला सांगावे, तर येथे सर्व साफ होऊन जाईल. एकदा पोलिसांना मोकळीक देऊन पाहावी,साफ सफाई हवी तर त्यांच्याशी बोलून पाहावे, त्यांना सर्व माहिती आहे. 48 तासांत सर्व साफ होऊन जाईल असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लॉ आमच्याकडे आणि ऑर्डर नाही मिळत – राज ठाकरे

आमच्याकडे लॉ आहे, परंतू ऑर्डर मिळत नाही. माझ्या हातात सरकार द्यावे.एकदा देऊन पाहावे. 48 तासांत सर्व काही साफ होईल, एकही गुन्हेगार राहणार नाही असे राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितले.

माजी मंत्री, एनसीपीचे नेते बाबा सिद्धीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आपल्या मुलाच्या ( झिशान ) कार्यालयात ते गेले होते. तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात खळबळ उडाली होती. या हत्येची जबाबदारी गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांच्या टोळीने घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. या गॅंगच्या हत्येतील सहभागाबाबत तपास केला जात आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....