AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्धीकी प्रकरणात राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्यं, माझ्या हातात सरकार द्या..48 तासांत

बाबा सिद्धीकी यांची हत्या झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर सरकारचे लोक सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहणार ? यावर आता राज ठाकरे यांनीही वक्तव्यं केले आहे.

बाबा सिद्धीकी प्रकरणात राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्यं, माझ्या हातात सरकार द्या..48 तासांत
| Updated on: Oct 30, 2024 | 5:50 PM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकाचे पडघम वाजत आहेत. माजी मंत्री आणि एनसीपीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. यावर आता विधानसभेत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर देखील भाष्य केले आहे.त्यांनी बाबा सिद्धीकी यांच्या नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणातही मोठे भाष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी एका खाजगी चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना बाबा सिद्धीकी यांच्या हत्ये संदर्भात प्रश्न विचारण्यात आला, त्याला उत्तर देताना ते म्हणाले की मुंबईतील बॉलीवूडमध्ये पूर्वी व्हायचे ते आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होत आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. त्यांना 48 तास देण्यात यावे, मुंबईला साफ करायला सांगावे, तर येथे सर्व साफ होऊन जाईल. एकदा पोलिसांना मोकळीक देऊन पाहावी,साफ सफाई हवी तर त्यांच्याशी बोलून पाहावे, त्यांना सर्व माहिती आहे. 48 तासांत सर्व साफ होऊन जाईल असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लॉ आमच्याकडे आणि ऑर्डर नाही मिळत – राज ठाकरे

आमच्याकडे लॉ आहे, परंतू ऑर्डर मिळत नाही. माझ्या हातात सरकार द्यावे.एकदा देऊन पाहावे. 48 तासांत सर्व काही साफ होईल, एकही गुन्हेगार राहणार नाही असे राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितले.

माजी मंत्री, एनसीपीचे नेते बाबा सिद्धीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आपल्या मुलाच्या ( झिशान ) कार्यालयात ते गेले होते. तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात खळबळ उडाली होती. या हत्येची जबाबदारी गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांच्या टोळीने घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. या गॅंगच्या हत्येतील सहभागाबाबत तपास केला जात आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.