AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये एमआयएमच्या मोर्चाला लाखाची गर्दी, सतर्कतेसाठी थेट 72 दिवसांसाठी जमावबंदी

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. हेच चित्र औरंगाबादमध्येही दिसलं (Aurangabad protest against CAA).

औरंगाबादमध्ये एमआयएमच्या मोर्चाला लाखाची गर्दी, सतर्कतेसाठी थेट 72 दिवसांसाठी जमावबंदी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 21, 2019 | 9:57 AM
Share

औरंगाबाद : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. हेच चित्र औरंगाबादमध्येही दिसलं (Aurangabad protest against CAA). औरंगाबादमध्ये या दोन्ही कायद्यांना विरोध करण्यासाठी 1 लाखाहून अधिक नागरिकांना उत्स्फुर्त हजेरी लावली. मात्र, यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी तात्काळ शहरात तब्बल 72 दिवसांसाठी कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे (Aurangabad protest against CAA).

नागरिक संविधानातील अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने मोर्चा करत असताना पोलिसांनी जमावबंदी लागू करणे विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पोलिसांनी जमावबंदी लागू करताना अशा मोर्चे आणि आंदोलनांचा देश विघातक शक्ती उपयोग करू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने निघणाऱ्या मोर्चे आणि आंदोलनांबाबत पोलीस प्रशासन काय मार्ग काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोलिसांनी 72 दिवसांसाठी शहरात जमावबंदी केल्याने कुठल्याही पक्ष किंवा संघटनेला आंदोलन करता येणार नाही. याबद्दल सामाजिक संघटना आणि नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएमचा महामोर्चा

औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात निदर्शने करण्यात आली होती. शुक्रवारच्या नमाजनंतर सर्व मुस्लिम नागरिकांनी, विविध शहरात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवला. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात एमआयएमने औरंगाबादेत महामोर्चा काढला. जलील यांच्या नेतृत्वात आझाद चौकातून या महामोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महामोर्चा रोशन गेट, चंपा चौक, बुढी लाईन, भडकल गेट, दिल्ली गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. या महामोर्चात मुस्लिम बांधव 1 लाखाहून अधिक संख्येने सहभागी झाले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक