AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटातील जिल्हाप्रमुखाच्या पॅनलचा राष्ट्रवादीने केला पराभव, राष्ट्रवादीचाच बोलबाला…

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचयातीवर राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.

शिंदे गटातील जिल्हाप्रमुखाच्या पॅनलचा राष्ट्रवादीने केला पराभव, राष्ट्रवादीचाच बोलबाला...
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Sep 19, 2022 | 2:30 PM
Share

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झालेले नाशिक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे (Bhaulal Tambde) यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) पक्षाच्या पॅनलचा विजय झाला असून सरपंच पदी दिपाली चारोस्कर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा हा पराभव संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तांबडे यांनी पॅनल उभा केला होता. मात्र, पॅनलचा पराभव राष्ट्रवादीने केल्याने दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादीचाच बोलबाला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिंडोरी तालुक्यात नरहरी झिरवाळ आमदार असून विधानसभेचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांचाच करिश्मा तालुक्यात असल्याचे दिसून येत आहेत.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचयातीवर राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.

दिंडोरीच्या वणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे मधुकर भरसट विजयी झाले आहेत. त्यांचा हा निकाल तालुक्यातील पहिला निकाल होता.

त्यानंतर जाणोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या पॅनलने विजयी मिळवला असून सरपंच पदी सुभाष नेहेरे विजयी झाले आहे.

मोहाडी ग्रामपंचयातीवर मात्र शिवसेनेने विजय मिळवत सरपंच पदी आशा लहानगे विजयी झाल्या आहे.

नळवाडपाडा येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे हिरामण गावित विजयी तर आंबेवणी ग्रामपंचायतीवर देखील राष्ट्रावादीच्या शोभा मातेरे विजयी झाल्या आहे.

करंजवण ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे संदीप गांगोडे विजयी झाले असून कोचरगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्याच कल्पना टोंगारे यांनी बाजी मारली आहे.

तर तळेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर यांनी विजय मिळवला असून शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.