AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमाफीसाठी 45 ते 51 हजार कोटींची गरज, 50 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ, एसबीआयचा अंदाज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनात दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. पण कर्जमाफीसाठी किती निधी लागेल.

कर्जमाफीसाठी 45 ते 51 हजार कोटींची गरज, 50 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ, एसबीआयचा अंदाज
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jan 07, 2020 | 11:30 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनात दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. पण कर्जमाफीसाठी किती निधी लागेल. त्याचबरोबर किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल याची आकडेवारी समोर आली नव्हती. पण स्टेट बँकेच्या (SBI Study on farmer loan waiver) अभ्यासातून हा आकडा समोर आाल आहे.

दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 45 ते 51 हजार कोटी लागतील. 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. भाजप-शिवसेना सरकारप्रमाणं अटी शर्थी लावल्या तरी 45 हजार कोटींची गरज लागेल. तसेच सरसकट कर्जमाफी दिल्यास 51 हजार कोटींचा भार येईल, असं स्टेट बँकेच्या (SBI Study on farmer loan waiver) अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं पैशांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. एकीकडे सरकार समोर निधीची जुळवाजुळव करण्याचं आव्हान आहे. तर केंद्राकडेही राज्य सरकारचा पैसा अडकलेला आहे.

विविध करांपोटी राज्य सरकारला केंद्राकडून 45 हजार 77 कोटी रुपये येणे बाकी आहेत. चालू आर्थिक वर्षातही राज्याचं बजेट 43 हजार कोटींच्या तोट्यात गेलं आहे. म्हणजेच खर्च आणि उत्पन्नाचा विचार केला, तर राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे, असं म्हणता येणार आहे. त्यामुळं कर्जमाफीसाठी सध्या तरी कर्ज काढण्याचा पर्याय ठाकरे सरकारसमोर असल्याचं दिसत आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ