AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी चुकीची, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले

ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी विक्रम गेहलोत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी चुकीची, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले
| Edited By: | Updated on: Oct 16, 2020 | 2:10 PM
Share

मुंबई : राज्यात ठाकरे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, महाराष्ट्रामध्ये राष्ट्पती शासन लावण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सरकारला हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला असून आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकता अशा शब्दात याचिकाकर्त्याला उत्तर देण्यात आलं आहे. ही याचिका सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. (Supreme Court rejected demand for imposition of presidential rule)

ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी विक्रम गेहलोत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का, असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते गेहलोत यांना खडेबोल सुनावले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सरकार संविधानाच्या आधारावर काम करत नाही असा आरोप याचिकर्ते गेहलोत यांनी केला होता. पण मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची घटना घडली. त्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे योग्य नसल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.

दरम्यान, राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे, मराठा आरक्षण, अस्मानी संकट डोक्यावर आहे अशात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यामुळे विरोधकांनी जोर धरत ठाकरे सरकार हटवण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी शक्यता प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या कायद्याकडे कानाडोळा करत आहे. कृषी विधेयक स्वीकारणार नाही, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. पण केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकतो, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता.

इतर बातम्या –

अशा भेटी होत राहतात, त्यात काही काळबेरं नाही, शिवेंद्रसिंहराजे भेटीवर अजित पवारांचा खुलासा
Gold Rate: सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड, 5547 रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर

(Supreme Court rejected demand for imposition of presidential rule)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.