AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चप्पूवरून प्रवास करताना तिघांचा मृत्यू, त्याच चप्पूवरुन प्रवास करून आमदार धस यांचा कुटुंबाला धीर

आज सुरेश धस यांनी वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव इथं भेट देऊन जिवाची परवा न करता थेट चप्पूवरून प्रवास करून घटनास्थळाची पाहणी केली

चप्पूवरून प्रवास करताना तिघांचा मृत्यू, त्याच चप्पूवरुन प्रवास करून आमदार धस यांचा कुटुंबाला धीर
| Edited By: | Updated on: Nov 04, 2020 | 8:36 PM
Share

बीड : आमदार सुरेश आण्णा धस हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत असतात. आताही अशीच घटना समोर आली आहे. आज सुरेश धस यांनी वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव इथं भेट देऊन जिवाची परवा न करता थेट चप्पूवरून प्रवास करून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. (Suresh Dhas journey from paddle in beed )

खळवट लिंबगाव ता.वडवणी इथं एकाच कुटुंबातील तीन जणांचा माजलगाव धरणातील बॅक वॉटरवरून चप्पू पलटी झाल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेकडे प्रशासनाचं लक्ष नसल्यानं गावकऱ्यांनी संतप्त होऊन 24 ऑक्टोबर रोजी वडवणी तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढून आंदोलन केलं होतं.

यानंतर आज या गावात आमदार सुरेश धस यांनी या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चप्पूवरून प्रवास करून सुरेश धस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सर्व ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात प्राणिकपणे मुद्दा उपस्थित करेन असाही शब्द त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला.

तब्बल 14 दिवसानंतरही या कुटुंबाला सरकारच्यावतीने प्रशासनाने कुठलीही मदत केली नाही. मदत व पुनर्वसन खात्याच्या शासन निर्णयाप्रमाणे मायनस ट्रेझरीमधून तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मदत देण्याचा अधिकार असतानाही दिरंगाई केल्यामुळे या प्रकरणात जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर खडक कारवाई करण्याची मागणीही आमदार सुरेश आण्णा धस यांनी केली आहे.

दरम्यान, वडवणी इथं एकाच कुटुंबातील पाच जण माजलगाव धरणातील बॅक वॉटरवरून पूल नसल्यामुळे चप्पूवरून आपल्या शेतातून घरी येत होते. यावेळी चप्पू पलटी झाल्यामुळे पाचही जण पाण्यात बुडाले. त्यापैकी आर्यन भारत फरताडे, पूजा राजाभाऊ काळे, सुशीला भारत फरताडे या तिघांचा यामध्ये मृत्यु झाला होता.

इतर बातम्या – 

उल्लासनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकचालकाने 5 ते 6 दुचाकींना उडवलं; पाहा CCTV व्हीडिओ
मोठी बातमी: पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णव गोस्वामींचा दावा कोर्टाने फेटाळला

(Suresh Dhas journey from paddle in beed )

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.