AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच नव्हे, जम्मूतून भाजपच्या दिग्गजांनाही परत पाठवलं होतं तेव्हा…

जम्मू काश्मीरमध्ये सध्या कोणत्याही नेत्यांना (BJP Leaders) येऊ दिलं जात नाही आणि कुणी गेल्यास त्यांना विमानतळाहूनच दिल्लीला परत पाठवलं जात होतं. भाजपच्या या तीन दिवंगत नेत्यांसोबतही 24 जानेवारी 2011 रोजी असंच झालं होतं.

काँग्रेसच नव्हे, जम्मूतून भाजपच्या दिग्गजांनाही परत पाठवलं होतं तेव्हा...
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 26, 2019 | 7:15 PM
Share

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातले तीन दिग्गज नेते माजी मंत्री अनंत कुमार, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली (BJP Leaders) सध्या हयात नाहीत. पण विरोधी पक्षात असताना अत्यंत आक्रमक असणाऱ्या या नेत्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. जम्मू काश्मीरमध्ये सध्या कोणत्याही नेत्यांना (BJP Leaders) येऊ दिलं जात नाही आणि कुणी गेल्यास त्यांना विमानतळाहूनच दिल्लीला परत पाठवलं जात होतं. भाजपच्या या तीन दिवंगत नेत्यांसोबतही 24 जानेवारी 2011 रोजी असंच झालं होतं.

प्रजासत्ताक दिनापूर्वी भाजपच्या युवा मोर्चाने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेसाठी सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंत कुमार जम्मूमध्ये गेले होते. पण कलम 144 लागू केलेलं असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी बंदी होती. यातच हे तीन नेते चार्टर्ड विमानाने जम्मू विमानतळावर दाखल झाले. पण या तिघांना पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली, ज्यानंतर तिघांनीही धरणं देण्याचा निर्णय घेतला.

डेक्कन हेराल्डने 24 जानेवारी 2011 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी अरुण जेटली यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. पण भाजपच्या या तीनही नेत्यांनी परत जाण्यास नकार दिला. यानंतर जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी विमानतळावर तत्कालीन पोलीस महासंचालक कुलदीप खोडा आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं. या अधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना विमानतळाच्या लाँजमध्ये बसण्याची विनंती केली, पण पुढे जाऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लाल चौकात भाजपकडून तिरंगा फडकवला जाणार होता. पण केंद्र आणि राज्य सरकारने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. भाजपच्या तीनही नेत्यांना कारमध्ये बसवण्यात आलं आणि पंजाबला रवाना केलं. यानंतर सुषमा स्वराज यांनी केंद्र सरकारचा जोरदार समाचार घेतला होता.

पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं होतं. “आम्ही जम्मू विमानतळावर उतरलो आणि विमानतळाचे सर्व गेट बंद करण्यात आले. आम्हाला बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आम्हाला त्यांनी कलम 144 अंतर्गत नोटीस दिली असून परत जाण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. सुरुवातीला तर त्यांनी आम्हाला विमानातून उतरण्यासाठीच मनाई केली. आम्ही आता बाहेर आलो आहेत. पोलीस महासंचालकही आले आणि आम्हाला कैदेत ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं, असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं होतं.

दरम्यान, कलम 144 हे फक्त जमावबंदीसाठी असून आमच्याविरोधात हे कलम वापरलं जाऊ शकत नाही, असं त्यावेळी जेटलींनी स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याशी बोलून पोलिसांच्या कारवाईबाबत तीव्र शब्दात निषेध केला होता.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…