AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरातील पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? तृप्ती देसाईंचा साई संस्थानला सवाल

मंदिरांतील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?, असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे. (Trupti Desai Saibaba Sansthan)

मंदिरातील पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? तृप्ती देसाईंचा साई संस्थानला सवाल
| Updated on: Dec 01, 2020 | 6:10 PM
Share

पुणे : मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी साई संस्थानला केला आहे. शिर्डीतील साईमंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असे आवाहन साई संस्थानतर्फे मंगळवारी (30 नोव्हेंबर) करण्यात आले. तशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले होते. यावर बोलताना देसाई यांनी हा सवाल केला. त्या पुणे येथे ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Trupti Desai on Saibaba Sansthan and costume of devotees)

हा तर संविधानाचा आवमान

साई संस्थानच्या या आवाहनावर बोलताना, अशा आशयाचे फलक लावणे म्हणजे हा भारतीय संविधानाचा अवमान असल्याचे त्या म्हणाल्या. “शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तगण देश-विदेशातून येतात. हे भक्त वेगवेगळ्या जातीधर्माचे असतात. शिर्डी संस्थानने मंदिर परिसरात भक्तांनी सभ्य पोशाख घालून यावं या आशयाचा एक बोर्ड लावला आहे. भारत देशात संविधान आहे. संविधानाने अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे कुणी काय बोलाव?, काय बोलू नये हा?, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा संविधानाचा आपमान आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, मंदिरामध्ये कशा पद्दतीचे कपडे घालायला पाहिजेत याचे भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरुन ठरवू शकत नाहीत. श्रद्धा महत्वाची असते, असं वक्तव्य त्यांनी साई संस्थानला उद्देशून केलं.

अन्यथा आम्हाला बोर्ड काढावा लागेल

यावेळी तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला मंदिर परिसरातला तो बोर्ड काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. अनेक मंदिरात, अगदी शिर्डी मंदिरातसुद्धा पुजारी अर्धनग्न अवस्थेत असतात. यावर अर्धनग्न पुजाऱ्यांसाठी मंदिरात प्रवेश नाही असा बोर्ड भक्तांनी कधीही लावलेला नाही असे, त्या म्हणाल्या. तसेच, जर तुम्ही काढला नाही तर आम्हाला येऊन तो बोर्ड काढावा लागेल असा ईशारादेखील त्यांनी साई संस्थानला दिला आहे.

साई संस्थानचे भक्तांना काय आवाहन?

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून (Saibaba Sansthan) करण्यात आलं आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितलं

संबंधित बातम्या :

अबब! अवघ्या 9 दिवसांत साईचरणी कोट्यवधींचं दान

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!, भाविक, पुजारी, व्यापारीही मास्कविना, ज्येष्ठांनाही मंदिरात प्रवेश

शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक

(Trupti Desai on Saibaba Sansthan and costume of devotees)

Follow Us
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.